शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

Assam Assembly Elections 2021: आसामला घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 05:23 IST

Assam Assembly Elections 2021 News : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे. 

बिजनी : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली जमीन यशस्वीपणे मुक्त केली आहे. चिरांग जिल्ह्यात बिजनी येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, अजमल हे दावा करतात की, आगामी सरकारची किल्ली त्यांच्या हातात असेल. मात्र, त्यांना याची कल्पना नाही की, कुलूप आणि किल्ली आसामच्या जनतेच्या हातात आहे. शहा यांनी काँग्रेसवर घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला आणखी पाच वर्षे द्या. माणसेच काय पक्षीही घुसखोरी करू शकणार नाहीत. अमित शहा म्हणाले की, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी अजमल यांच्याबाबत म्हटले होते की, कोण आहेत अजमल. मात्र, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, एआययूडीएफ आसामची ओळख आहे. हे राज्य वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव, भारतरत्न गोपीनाथ बोरदोलाई आणि भूपेन हजारिका यांचे आहे.  आज मतदानआसाम विधानसभा निवडणुकीत गुरुवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून त्यातून पाच मंत्री, उपसभापती आणि विरोधकांतील काही महत्त्वाच्या नेत्यांचे भवितव्य निश्चित होईल. या टप्प्यात २६ महिलांसह ३४५ उमेदवार मतदारांचा कौल मागत आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालेल.

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारणAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021