शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Assembly Election 2021: मुस्लिम बहुल भागात मिळाला 'भोपळा', भाजपाने अल्पसंख्याक मोर्चा विसर्जितच करून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:42 IST

Assam Assembly Election 2021: आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला संमिश्र यश मिळाले होते. (Assam Assembly Election 2021 )आसाम आणि पाँडेचेरीमध्ये भाजपाचा विजय झाला. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मात्र आसाममध्ये भाजपाला बहुमतासह विजय मिळाल्यानंतरही पक्षाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. ( 'zero' got in Muslim-majority areas, Assam BJP dissolves minority Cells)

आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले तरी मुस्लिम बहुल भागात भाजपाची कामगिरी निराशाजनक झाली. मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या आठ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपाला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाने मुस्लिम बहुल भागातील आठ मतदारसंघात भाजपाने आठ उमेदवार दिले होते. मात्र या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला. भाजपाला अनेक बुथवर २० हून कमी मते मिळाली. ही मते भाजपाच्या बुथ कमिटी मेंबर्सपेक्षाही कमी होती. त्यामुळे अखेरीच प्रदेश कार्यकारिणीने कठोर निर्णय घेतला आहे. 

याबाबत भाजपाचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष रंजित दास यांनी सांगितले की, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या राज्य, जिल्हा आणि मंडळ स्तरावरील सर्व शाखा तात्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात येत आहेत. आमच्या पक्षाच्या महिला, युवा, एससी आणि इतर विविध कार्यकारणी आहेत. तसाच अल्पसंख्याक मोर्चाही आहे. आम्ही अल्पसंख्याकांचे प्राबल्य असलेल्या काही मतदारसंघात उमेदवार दिले होते. मात्र या मतदारसंघांमधील अनेक बुथवर आमच्या उमेदवारांना २० मतेही मिळाली नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र दरम्यान, भाजपा राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे प्रमुख मुख्तार हुसेन खान यांनी या निर्णयामागचे नेमके कारण काय आहे माहिती नाही. पक्षाला अनेक ठिकाणी अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत, असे सांगितले.  १२६ सदस्य असलेल्या आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाजोतला ५० जागा मिळाल्या. उर्वरित एका जागेवर सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी विजय मिळवला होता.  

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMuslimमुस्लीमAssamआसामPoliticsराजकारण