शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

राजकारणात काहीही होऊ शकतं, नाना पटोले आमच्याकडेही येऊ शकतात : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 21:30 IST

Ramdas Athawale : राज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्य

ठळक मुद्देराज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार नाही, ते जावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आठवले यांचं वक्तव्यगो कोरोना गो नंतर आठवले यांचा नो कोरोना नो हा नारा

राजकारणात काहीही होऊ शकतं. काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले हेदेखील उद्या आमच्यासोबत येऊ शकतात, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला. राज्यातील ठाकरे सरकार जावं यासाठीही आमचे प्रयत्न सुरू असल्याचं आठवले म्हणाले. सांगली येथे एका कार्यक्रमानिमित्त रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत नाना पटोले हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "राज्यातील ठाकरे सरकार लवकर जावं ही आमची इच्छा असून यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे सरकार पाच वर्षही टिकणार नाही हे खरं आहे," असा दावा आठवले यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू नये ही आमची इच्छा आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सरकारडून प्रयत्न होणं आवश्यक आहे. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास राष्ट्रपती राजवटीबाबत विचार करावा लागणार असल्याचंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं. आता नो कोरोना नोयापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता त्यांनी नो कोरोना नो असा नवा नारा दिला आहे. "देशातीस दहा जिल्ह्यांमधील परिस्थिती गंभीर असून त्यातील आठ जिल्हे हे महाराष्ट्रातच आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं लक्ष देणं आवश्यत आहे. यापूर्वी मी गो कोरोना गो चा नारा दिला होता. परंतु आता जगातून कोरोना जावा यासाठी नो कोरोना नो असा नारा देत आहे," असंही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या