शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अमोल कोल्हे शुटिंगमध्ये व्यस्त, राष्ट्रवादीचे नेते- कार्यकर्ते त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:46 IST

तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले आहेत...

ठळक मुद्देफोनही लागेना : प्रचाराची तयारी, पण उमेदवारच नाही

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू असताना शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारअमोल कोल्हे गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. मुंबई येथे ते शुटींगसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे प्रचाराची तयारी केलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते त्रस्त आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या वेळी कोल्हे यांना उमेदवारी देऊन खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे आव्हान उभे करण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवस त्यांनी मतदारसंघात अनेक पदयात्रा काढल्या, सभा घेतल्या. परंतु, गेल्या चार दिवसांपासून कोल्हे यांचा प्रचारच बंद झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोल्हे यांच्या प्रचाराचे नियोजन केले होते.  त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र, ते शुटींगमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. जुन्नर तालुक्यापासून ते हडपसरपर्यंत पसरला आहे. मतदारसंघातील प्रमुख गावांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. उमेदवाराने किमान एकदा तरी आपल्य गावात येऊन जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, त्यांना  प्रतिसादच मिळत नसल्याने नाराजी आहे. एका बाजुला अमोल कोल्हे नॉट रिचेबल असताना तालुक्यातील कार्यकर्त्यांना नेत्यांकडून मार्गदर्शन मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. बहुतांश नेत्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे काय अशी परिस्थिती असल्याचे एका कार्यकत्यार्ने लोकमत शी बोलताना सांगितले. आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत दिलीप वळसे-पाटील यांच्याकडूनच सर्व निर्णय घेतले जायचे. मतदारसंघातील संपूर्ण प्रचारयंत्रणा त्यांच्याकडूनच सक्रिय मंचर या मध्यवर्ती ठिकाणाहून सर्व सूत्रे हलायची. मात्र, यावेळी मंचरहून निरोपच मिळत नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत. दुसºया बाजुला खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावोगावी दौर सुरू आहेत. त्याचबरोबर तालुकावार प्रचाराची यंत्रणाही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही प्रचार सुरू आहे. मात्र,राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सर्वच थंडा मामला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना