शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अमोल कोल्हे शुटिंगमध्ये व्यस्त, राष्ट्रवादीचे नेते- कार्यकर्ते त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 13:46 IST

तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले आहेत...

ठळक मुद्देफोनही लागेना : प्रचाराची तयारी, पण उमेदवारच नाही

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू असताना शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारअमोल कोल्हे गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. मुंबई येथे ते शुटींगसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे प्रचाराची तयारी केलेले  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते त्रस्त आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून यंदाच्या वेळी कोल्हे यांना उमेदवारी देऊन खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे आव्हान उभे करण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही दिवस त्यांनी मतदारसंघात अनेक पदयात्रा काढल्या, सभा घेतल्या. परंतु, गेल्या चार दिवसांपासून कोल्हे यांचा प्रचारच बंद झाला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी कोल्हे यांच्या प्रचाराचे नियोजन केले होते.  त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र, ते शुटींगमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे. जुन्नर तालुक्यापासून ते हडपसरपर्यंत पसरला आहे. मतदारसंघातील प्रमुख गावांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. उमेदवाराने किमान एकदा तरी आपल्य गावात येऊन जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, त्यांना  प्रतिसादच मिळत नसल्याने नाराजी आहे. एका बाजुला अमोल कोल्हे नॉट रिचेबल असताना तालुक्यातील कार्यकर्त्यांना नेत्यांकडून मार्गदर्शन मिळत नाही, अशी तक्रार केली जात आहे. बहुतांश नेत्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे काय अशी परिस्थिती असल्याचे एका कार्यकत्यार्ने लोकमत शी बोलताना सांगितले. आत्तापर्यंत शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत दिलीप वळसे-पाटील यांच्याकडूनच सर्व निर्णय घेतले जायचे. मतदारसंघातील संपूर्ण प्रचारयंत्रणा त्यांच्याकडूनच सक्रिय मंचर या मध्यवर्ती ठिकाणाहून सर्व सूत्रे हलायची. मात्र, यावेळी मंचरहून निरोपच मिळत नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत. दुसºया बाजुला खासदार शिवाजीराव आढळराव यांचे गावोगावी दौर सुरू आहेत. त्याचबरोबर तालुकावार प्रचाराची यंत्रणाही करण्यात आली आहे. सोशल मीडियावरही प्रचार सुरू आहे. मात्र,राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये सर्वच थंडा मामला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तुमचे उमेदवार ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल तुम्हाला विचारेनात. निवडणुकीनंतर मतदारांचे सोडा, कार्यकर्त्यांचे काय होईल? अशी विचारणा व्हायला लागल्यानेही कार्यकर्ते वैतागले 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेना