शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: लॉकडाऊन केलाच तर जनतेला तीन दिवसांचा वेळ द्या; शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:35 IST

Neelam Gorhe on Lockdown in Maharashtra: कोरोनाची लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे. (Shiv Sena leader Neelam Gorhe letter to CM Uddhav Thackeray on lockdown in Maharashtra.)

या पत्रामध्ये गोऱ्हे यांनी राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारीसाठी किमान तीन दिवसांचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देशही सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांची सोय करावी, त्यांना सूट द्यावी अशी मागणी केली आहे. 

राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर कोरोना टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची खलबते सुरु आहेत. यामध्ये मुख्यमंत्री ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे म्हणत आहेत. तर टास्क फोर्सचे सदस्य 15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या मताचे आहेत. यावर सविस्तर चर्चा करून आज किंवा उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. (CM Uddhav Thackeray meeting started with covid Corona Task Force in Mumbai on Lockdown in Maharashtra.)

लॉकडाऊन कधी? या आठवड्याच गुढी पाडवा आणि आंबेडकर जयंती आहे. यानंतर शुक्रवारपासून सध्या सुरु असलेला विकेंड लॉकडाऊन आहे. गुढी पाडव्याला किंवा शुक्रवारपासून 8 किंवा 14 दिवसांचा कडक ल़ॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोकांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळणार आहे. 

दिल्लीतदेखील लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन हा काही कोरोनावररचा उपाय नाही, परंतू विचार केला जाणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या लॉकाडाऊनवेळी केरीवालांनीच कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस