शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Lockdown: लॉकडाऊन केलाच तर जनतेला तीन दिवसांचा वेळ द्या; शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 18:35 IST

Neelam Gorhe on Lockdown in Maharashtra: कोरोनाची लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची (Corona) लाट रोखण्यासाठी आणि चेन तोडण्यासाठी कमीतकमी 14 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown in Maharashtra) गरज असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या (Corona Task Force) बैठकीत सदस्यांनी देखील 14 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे. (Shiv Sena leader Neelam Gorhe letter to CM Uddhav Thackeray on lockdown in Maharashtra.)

या पत्रामध्ये गोऱ्हे यांनी राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारीसाठी किमान तीन दिवसांचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देशही सफल होईल. तसेच बाराबलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने काहीतरी सोय करावी. तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांना त्यांच्या घरी जायचे आहे त्यांची सोय करावी, त्यांना सूट द्यावी अशी मागणी केली आहे. 

राज्यात किती दिवसांचा लॉकडाऊन करायचा यावर कोरोना टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांची खलबते सुरु आहेत. यामध्ये मुख्यमंत्री ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचे म्हणत आहेत. तर टास्क फोर्सचे सदस्य 15 दिवसांच्या लॉकडाऊनच्या मताचे आहेत. यावर सविस्तर चर्चा करून आज किंवा उद्या निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. (CM Uddhav Thackeray meeting started with covid Corona Task Force in Mumbai on Lockdown in Maharashtra.)

लॉकडाऊन कधी? या आठवड्याच गुढी पाडवा आणि आंबेडकर जयंती आहे. यानंतर शुक्रवारपासून सध्या सुरु असलेला विकेंड लॉकडाऊन आहे. गुढी पाडव्याला किंवा शुक्रवारपासून 8 किंवा 14 दिवसांचा कडक ल़ॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. असे झाल्यास लोकांना तयारीसाठी पुरेसा अवधी मिळणार आहे. 

दिल्लीतदेखील लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन हा काही कोरोनावररचा उपाय नाही, परंतू विचार केला जाणार असल्याचे म्हटले आहे. पहिल्या लॉकाडाऊनवेळी केरीवालांनीच कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे वक्तव्य केले होते. 

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस