शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावानेच केले १४०० एकर जमिनीचे व्यवहार; निलेश राणेंचा आरोप

By प्रविण मरगळे | Updated: September 23, 2020 20:18 IST

प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला लावली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ प्रकल्पबाधित जमिनीचे व्यवहार करत होते असा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.

ठळक मुद्देयुतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केलेसगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत.

मुंबई – नाणार प्रकल्पावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या जमिनीच्या व्यवहारात ८० टक्के परप्रांतीयांना जमिनी दिल्या असल्याचाही दावाही निलेश राणेंनी केला.

याबाबत निलेश राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी म्हटलं की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असं सांगितलं जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहे. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला असं त्यांनी सांगितले.

तसेच युतीच्या काळात शिवसेना नेत्यांनी मुखवटे घालून लोकांना भडकावून प्रकल्पाविरोधात आंदोलन केले, तेव्हा त्यांच्या मावशीचा मुलगा जमिनीचे व्यवहार करत होता. दीपक वायंगणकर नावाच्या एका व्यक्तीकडून त्यांनी राहण्यासाठी आणि ऑफिससाठी जमीन घेतली, लॉकडाऊनकाळात ऑफीस बंद पडल्याने स्टाफ निघून गेला. सध्या त्या ऑफिसला कोणीही नाही. कावतकर यांनी जमिनीचे अँग्रीमेंट बनवले. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करायला लावली, तेव्हा मुख्यमंत्र्यांचा मावस भाऊ प्रकल्पबाधित जमिनीचे व्यवहार करत होते असा आरोपही निलेश राणेंनी केला आहे.

त्याचसोबत मावशीचा मुलगा असल्याने त्यांच्याशी संबंध नाहीत असं मुख्यमंत्री सांगू शकत नाहीत, कारण यांच्या साखरपुड्यात, लग्न समारंभात उद्धव ठाकरेंचे फोटो आहेत. सुगी कंपनीने मध्यस्थी राहून जमिनीचे व्यवहार केले, त्यात ८० टक्के जमिनीचे व्यवहार परप्रांतीयांशी केले. ऋतुजा डेव्ल्हपर्स कंपनी जी पुण्याची आहे, तिनेही नाणारमध्ये ९०० एकर व्यवहार केला आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख कमलाकर कदम यांनी उफळे परिसरात ३६ एकर जमिनीवर स्वत:चं कुळ म्हणून लावलं आहे. त्याबाबत कोर्टात खटला सुरु आहे. प्रकल्पाला विरोध असताना यांचे विभागप्रमुख, शहराध्यक्ष जमिनीचे व्यवहार करत आहेत असंही निलेश राणे म्हणाले.

राजापूर एमआयडीसीमध्येही भ्रष्टाचार करण्यात आला आहे. कोवड, बारसू, सोलगाव येथे एमआयडीसी येणार असं नक्की झालं.  शिवसेनेचे पदाधिकारी संकेत खळपे, गजानन कोलवणकर, करण भुतकर यांनी शेतकऱ्यांकडून जमिनीची पॉवर ऑफ अर्टिनी घेतली, ज्या सातबारावर शासनाने बंदी आणली आहे. याच्या व्यवहाराला परवानी नसताना एमआयडीसीमधील बंद सातबाऱ्याची खरेदी झाली आहे. नाणार आणि राजापूर एमआयडीसी जी याच सरकारने जाहीर केली, त्यात शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे हात जमिनीच्या लूटमारीत बरबटलेले आहेत असा आरोप निलेश राणेंनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNilesh Raneनिलेश राणे nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेना