शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

“सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का?; हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष, लक्षात ठेवा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 17:33 IST

पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत  पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केलेशरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले

मुंबई – अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. मधुकर पिचड समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे, विधानसभा निवडणुकीपूर्वी वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यावेळी या कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश घेतला, परंतु आता पुन्हा या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली आहे. यावेळी बोलतना जयंत पाटील यांनी हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष हे ध्यानात ठेवा असा सूचक दमच भरला.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सगळे जिवाभावाचे काम करणारे लोक आहोत. पवारसाहेबांविषयी लोकांच्या मनात अतोनात प्रेम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत. त्यामुळे आम्ही पुन्हा ताकदीने पक्ष उभा करतोय. सीताराम गायकर पक्षातून गेले होते असं कधी जाणवलं नाही. आज आनंद झाला आहे. मालकीच्या घरात आलात अशा अविर्भावात प्रवेश केला आहात. पिचड यांनी पक्ष सोडला त्यामुळे आम्हाला नवा कार्यकर्ता मिळाला आणि किरण लहामटे निवडून आले असं त्यांनी सांगितले.

तसेच शरद पवार या हिमालयाकडे बघून तुम्ही राष्ट्रवादीचे लोक निवडून दिलेत. त्यामुळे ५४ आमदार आले. सत्ता आली नसती तर तुम्ही आला नसतात का? असा सवाल जयंत पाटील यांनी करताच एकच हशा पिकला. कारण लोक सत्ता नव्हती त्यावेळी थांबतही नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी सांगितली. पश्चिम घाट योजनेचा फायदा अकोलेला होणार आहे. बंधारे बांधण्याचे काम करत आहोत. भाजपच्या काळात आंदोलन करुनही कामे झाली नाहीत ती कामे किरण लहामटे आमदार झाल्यावर करत आहेत. आपल्या घरात आला आहात. गायकर यांनी जिल्हा बँकेवर काम केले आहे. त्यामुळे तालुका मर्यादित न रहाता जिल्हाकडेही त्यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष

नगर जिल्हयात कॅनालची भरपाई खूप दिली आहे. आता अकोले विकासासाठी कटिबद्ध आहोतच परंतु नगर जिल्हाही महत्वाचा आहे. नगर जिल्हयात आता ताकद आणखी वाढणार आहे. हा तुमच्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे लक्षात ठेवा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करणार आहे असं जयंत पाटील म्हणाले तर आपल्यातील जीवाभावाचा नेता येतोय त्यामुळे आनंद वाटला आहे.त्यांच्या पाठिशी ताकदीने उभा राहण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पक्ष सोडला तर जनता धडा शिकवते हे अकोले तालुक्याने दाखवून दिले आहे. तुम्ही पुन्हा पक्ष प्रवेश करुन चुक केली नाही असे तुम्हाला वाटणार नाही. तुमची सर्व कामे मार्गी लावेन असा शब्द देत  पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांचे स्वागत केले. सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली १२ संचालकांनी आणि अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ७२ दिग्गज पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.   

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटील