शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

"कृषी विधेयक शेतकऱ्यांना तर कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:14 IST

NCP Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांचे प्रतिपादन । दहिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा, कर्जतमधील विकासकामांवर भर

कर्जत : ‘केंद्र सरकारने देशात कृषी विधेयक आणले आहे. ते शेतकऱ्यांना तर नवीन कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल. त्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमध्ये पक्ष संघटनेत मरगळ आली होती. आता आजपासून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी येथे केले.

कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असेल? यासाठी कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष गीता पारलेचा, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, शरद लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ असे वाटले नव्हते; परंतु शरद पवारांमुळे ते शक्य झाले. कर्जत हा आधी काँग्रेसचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो आपल्या सर्वांच्या सहकायार्मुळे तसाच राहील. कर्जत तालुक्यातील विकासकामे पूर्वीसारखीच होतील. कर्जत - पनवेल रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.अदिती तटकरे यांनी, ‘पूर्वीपासूनच या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघाच्या बरोबरीने नव्हेतर, त्यापेक्षा जास्तच विकासकामे केली आहेत. त्याप्रमाणेच आताही काकणभर जास्तच कामे या मतदारसंघात होतील,’ असे सांगितले.नवीन कार्यकर्त्यांना संधीसुरेश लाड यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना, ‘नेरळमध्ये आता टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामसेवकाच्या आवाक्याबाहेर कामाचा व्याप आहे. तेथे नगरपालिका होणे गरजेचे आहे. कोंढाणा धरणही होणे आवश्यक आहे. तेसुद्धा कर्जतकरांसाठी. कारण भविष्यात पाण्यावरील वीजनिर्मिती बंद झाली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पक्ष संघटना बांधताना येथील पदाधिकाºयांनी आम्हाला आता बाजूला करा. नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे जरी सांगितले असले तरी या परिस्थितीत सध्या तरी बदल होणार नाही; मात्र सर्वांच्या विचाराने सारे काही व्यवस्थित होईल,’ असे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती