शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

"कृषी विधेयक शेतकऱ्यांना तर कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:14 IST

NCP Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांचे प्रतिपादन । दहिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा, कर्जतमधील विकासकामांवर भर

कर्जत : ‘केंद्र सरकारने देशात कृषी विधेयक आणले आहे. ते शेतकऱ्यांना तर नवीन कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल. त्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमध्ये पक्ष संघटनेत मरगळ आली होती. आता आजपासून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी येथे केले.

कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असेल? यासाठी कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष गीता पारलेचा, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, शरद लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ असे वाटले नव्हते; परंतु शरद पवारांमुळे ते शक्य झाले. कर्जत हा आधी काँग्रेसचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो आपल्या सर्वांच्या सहकायार्मुळे तसाच राहील. कर्जत तालुक्यातील विकासकामे पूर्वीसारखीच होतील. कर्जत - पनवेल रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.अदिती तटकरे यांनी, ‘पूर्वीपासूनच या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघाच्या बरोबरीने नव्हेतर, त्यापेक्षा जास्तच विकासकामे केली आहेत. त्याप्रमाणेच आताही काकणभर जास्तच कामे या मतदारसंघात होतील,’ असे सांगितले.नवीन कार्यकर्त्यांना संधीसुरेश लाड यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना, ‘नेरळमध्ये आता टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामसेवकाच्या आवाक्याबाहेर कामाचा व्याप आहे. तेथे नगरपालिका होणे गरजेचे आहे. कोंढाणा धरणही होणे आवश्यक आहे. तेसुद्धा कर्जतकरांसाठी. कारण भविष्यात पाण्यावरील वीजनिर्मिती बंद झाली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पक्ष संघटना बांधताना येथील पदाधिकाºयांनी आम्हाला आता बाजूला करा. नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे जरी सांगितले असले तरी या परिस्थितीत सध्या तरी बदल होणार नाही; मात्र सर्वांच्या विचाराने सारे काही व्यवस्थित होईल,’ असे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती