शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

"कृषी विधेयक शेतकऱ्यांना तर कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 23:14 IST

NCP Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांचे प्रतिपादन । दहिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा, कर्जतमधील विकासकामांवर भर

कर्जत : ‘केंद्र सरकारने देशात कृषी विधेयक आणले आहे. ते शेतकऱ्यांना तर नवीन कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल. त्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमध्ये पक्ष संघटनेत मरगळ आली होती. आता आजपासून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी येथे केले.

कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असेल? यासाठी कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष गीता पारलेचा, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, शरद लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ असे वाटले नव्हते; परंतु शरद पवारांमुळे ते शक्य झाले. कर्जत हा आधी काँग्रेसचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो आपल्या सर्वांच्या सहकायार्मुळे तसाच राहील. कर्जत तालुक्यातील विकासकामे पूर्वीसारखीच होतील. कर्जत - पनवेल रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.अदिती तटकरे यांनी, ‘पूर्वीपासूनच या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघाच्या बरोबरीने नव्हेतर, त्यापेक्षा जास्तच विकासकामे केली आहेत. त्याप्रमाणेच आताही काकणभर जास्तच कामे या मतदारसंघात होतील,’ असे सांगितले.नवीन कार्यकर्त्यांना संधीसुरेश लाड यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना, ‘नेरळमध्ये आता टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामसेवकाच्या आवाक्याबाहेर कामाचा व्याप आहे. तेथे नगरपालिका होणे गरजेचे आहे. कोंढाणा धरणही होणे आवश्यक आहे. तेसुद्धा कर्जतकरांसाठी. कारण भविष्यात पाण्यावरील वीजनिर्मिती बंद झाली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पक्ष संघटना बांधताना येथील पदाधिकाºयांनी आम्हाला आता बाजूला करा. नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे जरी सांगितले असले तरी या परिस्थितीत सध्या तरी बदल होणार नाही; मात्र सर्वांच्या विचाराने सारे काही व्यवस्थित होईल,’ असे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती