शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

कायदे मागे न घेतल्यास आंदोलन शहरांपर्यंत; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:17 IST

राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

शीलेश शर्मानवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले नाहीत तर शेतकऱ्यांचे आंदोलन शहरांतही पोहोचेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे कारण आंदोलक शेतकरी एक इंचही मागे सरकणार नाहीत, असेही गांधी म्हणाले.

मोदी सरकारवर हल्ला करताना गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता त्यांना धमकावले व भीती घातली जात आहे. गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करून विचारले की, शेतकऱ्यांच्या जमावाला लाल किल्ल्यात कोणी घुसू दिले? शहा यांनी देशाला सांगावे की, आंदोलन करणारे पोलीस बंदोबस्त असतानाही लाल किल्ल्यात कसे शिरले? गुप्तहेर यंत्रणा काय करीत होती? पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तिन्ही कायदे मागे घेऊन त्यांची शेतकऱ्यांशी चर्चा व्हावी. काँग्रेसदेखील कृषिक्षेत्रात सुधारणा व्हाव्यात या बाजूने आहे; परंतु जो वर्ग यामुळे प्रभावित होईल त्याला विश्वासात घ्यावे लागेल. त्यासाठी काँग्रेस पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

काँग्रेस पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून तो त्यांच्यासोबत राहील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी मोदी यांना इशारा दिला की, तुम्हाला शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा लागेल, कारण तो देशाचा आहे. मोदी सरकार मोजक्या भाडंवलदार मित्रांसाठी शेतकरी, मजुरांची भाकरी चोरत आहेत. ही चोरी कोणतीही किंमत मोजून काँग्रेस होऊ देणार नाही. राहुल यांनी हे मान्य केले की, मी आंदोलक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात नाही; परंतु पक्षाचे नेते संपर्कात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार