शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

कायदे मागे न घेतल्यास आंदोलन शहरांपर्यंत; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:17 IST

राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

शीलेश शर्मानवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले नाहीत तर शेतकऱ्यांचे आंदोलन शहरांतही पोहोचेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे कारण आंदोलक शेतकरी एक इंचही मागे सरकणार नाहीत, असेही गांधी म्हणाले.

मोदी सरकारवर हल्ला करताना गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता त्यांना धमकावले व भीती घातली जात आहे. गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करून विचारले की, शेतकऱ्यांच्या जमावाला लाल किल्ल्यात कोणी घुसू दिले? शहा यांनी देशाला सांगावे की, आंदोलन करणारे पोलीस बंदोबस्त असतानाही लाल किल्ल्यात कसे शिरले? गुप्तहेर यंत्रणा काय करीत होती? पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तिन्ही कायदे मागे घेऊन त्यांची शेतकऱ्यांशी चर्चा व्हावी. काँग्रेसदेखील कृषिक्षेत्रात सुधारणा व्हाव्यात या बाजूने आहे; परंतु जो वर्ग यामुळे प्रभावित होईल त्याला विश्वासात घ्यावे लागेल. त्यासाठी काँग्रेस पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

काँग्रेस पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून तो त्यांच्यासोबत राहील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी मोदी यांना इशारा दिला की, तुम्हाला शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा लागेल, कारण तो देशाचा आहे. मोदी सरकार मोजक्या भाडंवलदार मित्रांसाठी शेतकरी, मजुरांची भाकरी चोरत आहेत. ही चोरी कोणतीही किंमत मोजून काँग्रेस होऊ देणार नाही. राहुल यांनी हे मान्य केले की, मी आंदोलक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात नाही; परंतु पक्षाचे नेते संपर्कात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार