शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कायदे मागे न घेतल्यास आंदोलन शहरांपर्यंत; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 06:17 IST

राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

शीलेश शर्मानवी दिल्ली : तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले नाहीत तर शेतकऱ्यांचे आंदोलन शहरांतही पोहोचेल, असा इशारा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला. सरकारने गैरसमजातून बाहेर यावे कारण आंदोलक शेतकरी एक इंचही मागे सरकणार नाहीत, असेही गांधी म्हणाले.

मोदी सरकारवर हल्ला करताना गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता त्यांना धमकावले व भीती घातली जात आहे. गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करून विचारले की, शेतकऱ्यांच्या जमावाला लाल किल्ल्यात कोणी घुसू दिले? शहा यांनी देशाला सांगावे की, आंदोलन करणारे पोलीस बंदोबस्त असतानाही लाल किल्ल्यात कसे शिरले? गुप्तहेर यंत्रणा काय करीत होती? पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, तिन्ही कायदे मागे घेऊन त्यांची शेतकऱ्यांशी चर्चा व्हावी. काँग्रेसदेखील कृषिक्षेत्रात सुधारणा व्हाव्यात या बाजूने आहे; परंतु जो वर्ग यामुळे प्रभावित होईल त्याला विश्वासात घ्यावे लागेल. त्यासाठी काँग्रेस पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनात सर्व प्रकारे मदत करील. शेतकऱ्यांनी संघर्ष करावा.

काँग्रेस पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा असून तो त्यांच्यासोबत राहील, असेही ते म्हणाले. राहुल यांनी मोदी यांना इशारा दिला की, तुम्हाला शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा लागेल, कारण तो देशाचा आहे. मोदी सरकार मोजक्या भाडंवलदार मित्रांसाठी शेतकरी, मजुरांची भाकरी चोरत आहेत. ही चोरी कोणतीही किंमत मोजून काँग्रेस होऊ देणार नाही. राहुल यांनी हे मान्य केले की, मी आंदोलक शेतकऱ्यांच्या थेट संपर्कात नाही; परंतु पक्षाचे नेते संपर्कात आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार