शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:50 IST

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे

ठळक मुद्देया पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहेगुंजवणी धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले.गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती.

मुंबई – अलीकडेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(Shivsena Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या पत्रातून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. असा आरोप केला होता. त्यामुळे शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली होती.

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रात विजय शिवतारे म्हणतात की, गुंजवणी धरण मी राज्यमंत्री असताना मोठ्या मेहनतीतून पुरंदर, भोर आणि वेल्हे या तीन तालुक्यांना वरदान ठरेल यासाठी पूर्ण केले होतं. या धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती. त्यासाठी १३१३ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. वेल्हे आणि भोरचं काम पूर्ण झालं. परंतु पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी या योजनेचे काम बंद करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.

याठिकाणचे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांना धमक्या देऊन गुंजवणीचं पाणी पुरवठा काम बंद केले आहे. या कामाचं भूमिपूजन स्वत:च्या हस्ते व्हावं यासाठी आमदारांचा आग्रह आहे. ही योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतून जलसंपदा विभागाशी समन्वय साधत मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली. जलवाहिनीद्वारे १०० टक्के सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी १३१३ कोटींची मंजुरी मिळवण्यात मला यश आलं. मात्र हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्याकडे सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. ज्यांनी या प्रकल्पाचं काम बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असून शकत नाही असं विजय शिवतारे यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय या कामाचा शुभारंभ आपल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल अशी इच्छा विजय शिवतारेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpratap sarnaikप्रताप सरनाईकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस