शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत आणखी एक लेटरबॉम्ब; सरनाईकांनंतर आता विजय शिवतारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 16:50 IST

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे

ठळक मुद्देया पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहेगुंजवणी धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले.गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती.

मुंबई – अलीकडेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक(Shivsena Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहिलं होतं. या पत्रानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. या पत्रातून महाविकास आघाडीतल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेना कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. असा आरोप केला होता. त्यामुळे शिवसेनेने भाजपाशी जुळवून घ्यावं अशी मागणी सरनाईकांनी केली होती.

प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर आता विजय शिवतारे यांनीही हॉस्पिटलमधूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात शिवतारेंनी पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रात विजय शिवतारे म्हणतात की, गुंजवणी धरण मी राज्यमंत्री असताना मोठ्या मेहनतीतून पुरंदर, भोर आणि वेल्हे या तीन तालुक्यांना वरदान ठरेल यासाठी पूर्ण केले होतं. या धरणाला १९९३ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये हे धरण पूर्ण झाले. गुंजवणीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्याला पुरवठा करण्याची योजना आखली होती. त्यासाठी १३१३ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. वेल्हे आणि भोरचं काम पूर्ण झालं. परंतु पुरंदर तालुक्यात काही दिवसांपूर्वी या योजनेचे काम बंद करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले.

याठिकाणचे स्थानिक आमदार संजय जगताप यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. इतकचं नाही तर अधिकाऱ्यांना धमक्या देऊन गुंजवणीचं पाणी पुरवठा काम बंद केले आहे. या कामाचं भूमिपूजन स्वत:च्या हस्ते व्हावं यासाठी आमदारांचा आग्रह आहे. ही योजना लवकर पूर्ण करण्याच्या हेतून जलसंपदा विभागाशी समन्वय साधत मी पुरंदर तालुक्यातही जलवाहिनीच्या कामास सुरुवात केली. जलवाहिनीद्वारे १०० टक्के सूक्ष्म सिंचन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी १३१३ कोटींची मंजुरी मिळवण्यात मला यश आलं. मात्र हरित लवाद, जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरण, उच्च न्यायालय, केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्याकडे सातत्याने याचिका करून हे काम होऊ नये यासाठी मला त्रास देण्यात आला. ज्यांनी या प्रकल्पाचं काम बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले त्यांच्याच हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ व्हावा याच्या इतकी शोकांतिका असून शकत नाही असं विजय शिवतारे यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय या कामाचा शुभारंभ आपल्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावा, तो ऑनलाईन झाला तरी चालेल अशी इच्छा विजय शिवतारेंनी पत्रात व्यक्त केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेpratap sarnaikप्रताप सरनाईकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस