शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

Sanjay Rathod: “पुरावे असतानाही कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत, संजय राठोड मोकाट कसे फिरतायेत?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:27 IST

BJP Chitra Wagh Targeted Sanjay Rathod: एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

ठळक मुद्देभगिनींनी रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवावा जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल तालिबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या माजी मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. एका महिलेने संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यावरून विरोधी पक्ष भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. इतके पुरावे असून कुणाच्या सांगण्यावरून संजय राठोड यांना बेड्या ठोकल्या नाहीत असा सवाल भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

याबाबत चित्रा वाघ(BJP Chitra Wagh) म्हणाल्या की, शिवसेनेच्या संजय राठोडांवर(Sanjay Rathod) आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहतोय? अशी तालिबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय असा घणाघात त्यांनी केला.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) एकच प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का? आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की, रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवावा जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल असा टोला चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

संजय राठोडांनी आरोप फेटाळले

यवतमाळ जिल्ह्यातील पहूरनजीक शिवपुरी येथे छत्रपती शिवाजी कला शिक्षण विकास कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था आहे. या संस्थेचा मी सचिव होतो. संस्थेतील तीन शिक्षकांना अनियमिततेच्या कारणावरून २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या शिक्षकांनी समाज कल्याण विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर आयुक्तांकडे प्रकरण गेले. या दोनही ठिकाणी संस्थेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यानच्या काळात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर तीन शिक्षकांना संस्थेने नियुक्ती दिली. यातील एका शिक्षकाने स्वत:हून राजीनामा दिला. तसे पत्रही संस्थेकडे आहे. हाच शिक्षक पुन्हा संस्थेमध्ये घेण्याची मागणी करीत आहे. यावर न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर याबाबत ठरवू, असे मी त्याला स्पष्ट केले. मात्र, माझ्यावर तसेच संस्थेवर विविध प्रकारे दबाव आणण्यात येऊ लागला.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाChitra Waghचित्रा वाघ