शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Jitin Prasad: जितिन प्रसाद यांचं भाजपात उज्ज्वल भविष्य; काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 09:15 IST

पक्षाच्या हायकमांडला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवेन असं आदिती म्हणाल्या.

ठळक मुद्देपक्षाचे दिग्गज नेते पक्ष का सोडत आहेत? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे काँग्रेस एका घराण्याचा पक्ष बनत चाललाय. जितिन प्रसाद यांचे भाजपात उज्ज्वल भविष्य आहेआमदार आदिती सिंह यांनी साधला पक्षनेतृत्वावर निशाणा, काँग्रेस सोडण्याचे संकेत

लखनौ – काँग्रेस नेता जितिन प्रसाद(Jitin Prasad) यांनी भाजपात प्रवेश केल्यानं उत्तर प्रदेशात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपा(BJP) प्रवेशानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदार आदिती सिंह(Congress Rebel MLA Aditi Singh) यांनीही यावर भाष्य केले आहे.

आमदार आदिती सिंह म्हणाल्या की, पक्षाच्या हायकमांडला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवेन. जितिन प्रसाद यांचे पक्ष सोडणं काँग्रेससाठी तोट्याचं आहे. ज्येष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेशच्या ग्राऊंड लेव्हलवर उतरून काम करण्याची गरज आहे. पक्षाचे दिग्गज नेते पक्ष का सोडत आहेत? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आदिती सिंह म्हणाल्या.

तसेच उत्तर प्रदेशच्या राजकीय आखाड्यात काँग्रेसनं काम करण्याची आवश्यकता आहे. मी सत्य आणि स्पष्ट सांगते. माझं म्हणणं जर कोणाला वाईट वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. मी प्रियंका गांधी यांच्यावर काही टीप्पणी केली नाही मात्र त्यांना प्रत्यक्षात हे सगळं पाहायला हवं. जितिन प्रसाद यांचे काँग्रेसमधून जाणं हे पक्षासाठी मोठं नुकसान आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद असे नेते पक्ष काय सोडतायेत यावर विचार व्हावा. काँग्रेस एका घराण्याचा पक्ष बनत चाललाय. जितिन प्रसाद यांचे भाजपात उज्ज्वल भविष्य आहे असंही आमदार आदिती सिंह यांनी सांगितले.

कोण आहेत जितिन प्रसाद?

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती.

जितिन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहाँपूर आणि २००९ मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. २०११-१२ पर्यंत पेट्रोलियम आणि २०१२-१४ पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा