शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:45 IST

राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.

तळेगाव दाभाडे - राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल विभाग, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावरील व्याख्यानात सुभाष वारे बोलत होते.या वेळी प्राचार्य डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील डॉ. भौमिक देशमुख, इंद्रायणी फार्मसी विभागाचे प्राचार्य बी. बी. जैन, प्रा. एस. एन. शिंदे, बहि:शाल केंद्र कार्यवाह डॉ. संदीप कांबळे, प्रा. के. व्ही. अडसूळ, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. दीप्ती पेठे, प्रा. सत्यम सानप, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. स्मिता भेगडे, प्रा. सोनल चव्हाण, प्रा. विद्या भेगडे, प्रा. दिगंबर मोहोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. मलघे होते.वारे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. संविधानातील ‘संधीची समानता’ हा शब्द स्वातंत्र्याची जाणीव या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विरोधकांचा तर्क लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवावी लागते. स्वातंत्र्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आज व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. माणसाला समाज वाचता आला, तर काहीही अशक्य नाही. ’’डॉ. भौमिक देशमुख यांनी ‘आदिवासींच्या स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावर विचार व्यक्त केले.प्राचार्य डॉ. बाळसराफ यांनी स्वातंत्र्याची जाणीव, संकल्पना आणि स्वरूप या विषयाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. मलघे यांनी मानले.आदिवासी समाज या देशातला पहिला निवासी समाज आहे. या समाजाने समाजसुधारणेसाठी कायमच मोठे योगदान दिले आहे. आदिवासी लोकांची मानसिकता कायम स्वातंत्र्यप्रेमी राहिली आहे. स्वातंत्र्याच्या कामी आदिवासींची भूमिका निर्णायक राहिली आहे. या समाजाबद्दल म्हणावे तितके लेखन झालेले नाही. याविषयी अधिक संशोधन व लेखन होण्याची आवश्यकता आहे.- डॉ. भौमिक देशमुखआरक्षणाविषयीचे फक्त नियम बनवून चालत नाहीत, तर ते अमलातही आणण्याची आवश्यकता आहे. संविधान हे एक मूल्यव्यवस्था देणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, फक्त संसद, फक्त न्यायालय, फक्त कायदा नागरिकांना मूलभूत हक्कांची शाश्वती देऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे व्यवस्थित आकलन करून घेतले पाहिजे.- प्रा. सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड