शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

स्त्रिया, दलितांना हवे ख-या अर्थाने स्वातंत्र्य - सुभाष वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:45 IST

राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.

तळेगाव दाभाडे - राज्यघटनेने सर्वांना समान स्वातंत्र्य प्रदान केले आहे. समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सर्वांत आधी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला होता, हे दुर्लक्षून चालणार नाही. स्त्रिया व दलितांना खºया अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल विभाग, ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष आणि तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावरील व्याख्यानात सुभाष वारे बोलत होते.या वेळी प्राचार्य डी. डी. बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातील डॉ. भौमिक देशमुख, इंद्रायणी फार्मसी विभागाचे प्राचार्य बी. बी. जैन, प्रा. एस. एन. शिंदे, बहि:शाल केंद्र कार्यवाह डॉ. संदीप कांबळे, प्रा. के. व्ही. अडसूळ, प्रा. राजेंद्र आठवले, प्रा. दीप्ती पेठे, प्रा. सत्यम सानप, प्रा. मधुकर देशमुख, प्रा. स्मिता भेगडे, प्रा. सोनल चव्हाण, प्रा. विद्या भेगडे, प्रा. दिगंबर मोहोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. के. मलघे होते.वारे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य हा संविधानाचा गाभा आहे. संविधानातील ‘संधीची समानता’ हा शब्द स्वातंत्र्याची जाणीव या दृष्टीने महत्त्वाचा आहे. विरोधकांचा तर्क लक्षात घेऊन आपली भूमिका ठरवावी लागते. स्वातंत्र्यामुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो. आज व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येताना दिसत आहे. स्वातंत्र्याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. माणसाला समाज वाचता आला, तर काहीही अशक्य नाही. ’’डॉ. भौमिक देशमुख यांनी ‘आदिवासींच्या स्वातंत्र्याची जाणीव’ या विषयावर विचार व्यक्त केले.प्राचार्य डॉ. बाळसराफ यांनी स्वातंत्र्याची जाणीव, संकल्पना आणि स्वरूप या विषयाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी, तर आभार उपप्राचार्य डॉ. मलघे यांनी मानले.आदिवासी समाज या देशातला पहिला निवासी समाज आहे. या समाजाने समाजसुधारणेसाठी कायमच मोठे योगदान दिले आहे. आदिवासी लोकांची मानसिकता कायम स्वातंत्र्यप्रेमी राहिली आहे. स्वातंत्र्याच्या कामी आदिवासींची भूमिका निर्णायक राहिली आहे. या समाजाबद्दल म्हणावे तितके लेखन झालेले नाही. याविषयी अधिक संशोधन व लेखन होण्याची आवश्यकता आहे.- डॉ. भौमिक देशमुखआरक्षणाविषयीचे फक्त नियम बनवून चालत नाहीत, तर ते अमलातही आणण्याची आवश्यकता आहे. संविधान हे एक मूल्यव्यवस्था देणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, फक्त संसद, फक्त न्यायालय, फक्त कायदा नागरिकांना मूलभूत हक्कांची शाश्वती देऊ शकत नाही. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचे व्यवस्थित आकलन करून घेतले पाहिजे.- प्रा. सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड