शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोण प्रदूषित करतंय? इंद्रायणी पुन्हा फेसाळली; प्रशासनाला जाग कधी येणार

By विश्वास मोरे | Updated: January 3, 2024 12:30 IST

इंद्रायणी कोण प्रदूषित करतेय हे अजूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सापडलेले नाही

पिंपरी : इंद्रायणीनदी सुधारच्या नुसत्या गप्पा मारल्या जात आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये इंद्रायणीनदी चार वेळा फेसाळली आहे. वारंवार नदी फेसाळत आहे. मात्र, एमआयडीसी, पीएमआरडीए, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला त्याचे गांभीर्य नाही. इंद्रायणी कोण प्रदूषित करतेय हे अजूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सापडलेले नाही. 

इंद्रायणी नदीच्या उगम ते संगम या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण वाढले आहे.  लोणावळ्यापासून तर तुळापूर पर्यंत नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. इंद्रायणीच्या काठावर तळेगाव एमआयडीसी, देहू निघोजे एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भाग वसलेला आहे. चाकण आणि आळंदीच्या साईटने निघोजेपासून तर आळंदीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे.  तसेच मोठ्या प्रमाणावर कंपन्या निर्माण झाले आहे. 

एमआयडीसी पीएमआरडीए आणि नगरपालिका महानगरपालिका यांचा भाग नदीकाठी आहे. या भागातील मैला सांडपाणी तसेच कंपन्यांचे रसायन युक्त पाणी थेटपणे नदीमध्ये सोडले जात आहे. याचा परिणाम आषाढीवारीपासून कार्तिकीवारी पर्यंत चारवेळा नदी फेसाळली आहे. काल सायंकाळपासून नदी फेसाळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बुधवारी सकाळपर्यंत सलग दुसऱ्या दिवशी इंद्रायणी नदीचे हे भयाण रूप पहायला मिळाले. याबाबत पर्यावरणवादी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

राजकारणी नुसतेच पत्रके काढण्यात व्यस्त!

पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आमदार खासदार हे नुसतेच प्रसिद्ध पत्रकार काढण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. नदी प्रदूषणाबाबत अधिवेशनात आवाज उठवला गेला. त्याची प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, उपाययोजनांना अजूनही सुरुवात झालेली नाही.

टॅग्स :Puneपुणेindrayaniइंद्रायणीriverनदीpollutionप्रदूषणSocialसामाजिकGovernmentसरकार