शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:42 IST

आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण?

पिंपरी : आम्ही कालच वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र केले. त्यानंतर श्रीनगरला आलो. पहलगामला दहशतवादी हल्ला झाल्याने पुढील पर्यटनाचा बेतच रद्द केला आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले आहे. घरी परतण्यासाठी श्रीनगरला सात तास विमानतळावर बसून होतो, अशी माहिती वाकड येथील शैलेश बोरसे यांनी बुधवारी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकडमधील संतोषनगरमधील बोरसे कुटुंबातील शैलेश, रूपाली, महिका, स्पर्श, सागर आणि बागूल कुटुंबातील ऊर्मिला व मुलगा शर्विल हे कुटुंबीय पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरला गेले आहेत. पहिल्या दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंगळवारी रात्री श्रीनगर येथे आले.

शैलेश बोरसे म्हणाले, एका खासगी पर्यटन कंपनीच्या वतीने सोमवारपर्यंत (२८ एप्रिल) जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाचे नियोजन केले होते. दोन कुटुंबांतील आम्ही सातजण आलो आहोत. या परिसरातील रस्ते अरुंद असून हा बर्फाच्छादित प्रदेश आहे. वैष्णोदेवीहून श्रीनगरला परतताना खूप वेळ लागला. मात्र, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने आम्ही सर्वांनी चर्चा केली. वातावरण गंभीर असल्याने पुन्हा घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळपासून आम्ही पुण्यास येण्यासाठी श्रीनगरच्या विमानतळावर बसून होतो. पुणे जिल्ह्यातील प्रशासनानेही आमच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर सायंकाळी चारच्या विमानाने दिल्लीत आलो. रात्री साडेनऊला विमान असून रात्री उशिरा पुण्यात परतणार आहोत. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर मोठा परिणाम झाला असून त्यात आमचेही नुकसान झाले आहे. आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण?

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाwakadवाकडairplaneविमानJammu Kashmirजम्मू-काश्मीरMONEYपैसा