शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

पिंपरीत नियोजनाअभावी पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 1:43 AM

पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा ...

पिंपरी : पवना धरण १०० टक्के भरले असताना शहरात पाणीटंचाई आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांनी कंठशोष करूनही प्रशासन ढिम्म आहे. पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक आज झाली. पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रियतेवर सत्ताधाºयांनी जोरदार टीका केली. नियोजनाअभावी पाणीटंचाई झाली असून, दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर प्रशासनाविरोधात आंदोलन करू, असा इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे.

शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक, नगरसेवक त्रस्त आहेत. तक्रारी वाढू लागल्याने महापौरांनी आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. महापौरांसह पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्यासह कार्यकारी अभियंते, उपअभियंते, पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, ‘‘शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यास पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी कारणीभूत आहेत. अनेक सूचना देऊनही दखल घेतली जात नाही. आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना जर पाणीपुरवठा विभाग उत्तरे देऊ शकत नसेल, तर दुर्दैवाची बाब आहे. धरण शंभर टक्के भरले आहे. मात्र, पाणी आरक्षणानुसार मिळत आहे. पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारायला हवा. नियोजनाअभावी पाणीटंचाई आहे. नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात. त्यांना उत्तर द्यावे लागते. निष्क्रिय प्रशासनाला वठणीवर आणण्याची गरज आहे. कामचुकार अधिकारी कोणीही असो, आता त्याची गय केली जाणार नाही. दोन दिवसांत पाणी सुरळीत झाले नाही, तर त्यास जबाबदार अधिकाºयावर कारवाई केली जाईल. निलंबित केले जाईल. तरीही कामात सुधारणा न झाल्यास जनतेसाठी मी आंदोलन करीन.

प्रशासनाचा हलगर्जीपणापाणी पुरेसे असूनही टंचाई आहे. नियोजन नसल्यामुळे हे घडत आहे. त्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. गळती शोधण्याची गरज आहे. तसेच जे काम करणार नाहीत किंवा पाणीटंचाईस कारणीभूत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागातील पाणीपुरवठ्याची माहिती विचारली होती. मात्र, त्याचे उत्तरही देता आले नाही, असे सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड