शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

PCMC: पवना धरणातील पाणी मेपर्यंत पुरेल, कपातीचे नियोजन नाही; पालिकेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:05 IST

तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.....

पिंपरी : औद्योगिकनगरीची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणात सध्या ८८ टक्के पाणीसाठा आहे. तो पुढील मेपर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.

मावळातील पवना धरणातूनपिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलून प्राधिकरणातील शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत पाणी पोहोचवले जाते.

पावसाचे प्रमाण कमी

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मावळ परिसरात आजपर्यंत २८३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये ७.५३ टीएमसी साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा १२ टक्के साठा घटला आहे. गणेशोत्सवानंतर पावसाने ओढ दिली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिले तर पाणी कपातीचे संकट येणार आहे.

पाणी कपातीचे नियोजन नाही

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चार वर्षांपासून दिवसाआड पाणी सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे तूर्तास आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन नाही. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा

मावळातील पवना धरणातून आता जेवढे पाणी सोडले जाते, तेवढीच मागणी राहिली तर मेपर्यंत पाणी पुरेल. त्यापेक्षा मागणी कमी झाली तर जुलै-ऑगस्टपर्यंत पाणी पुरवता येईल. मावळातील पवना धरणामध्ये गेल्यावर्षी याच महिन्यामध्ये ९० साठा होता. तो आता कमी झाला आहे.

- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाDamधरण