शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

PCMC: पवना धरणातील पाणी मेपर्यंत पुरेल, कपातीचे नियोजन नाही; पालिकेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:05 IST

तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.....

पिंपरी : औद्योगिकनगरीची जीवनदायिनी असणाऱ्या पवना धरणात सध्या ८८ टक्के पाणीसाठा आहे. तो पुढील मेपर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तूर्तास पाणी कपात करण्याचे नियोजन नाही, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे.

मावळातील पवना धरणातूनपिंपरी-चिंचवड शहरास पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत पाणी सोडले जाते. रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलून प्राधिकरणातील शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे पाण्यावर प्रक्रिया करून जलवाहिनीच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत पाणी पोहोचवले जाते.

पावसाचे प्रमाण कमी

यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. मावळ परिसरात आजपर्यंत २८३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये ७.५३ टीएमसी साठा आहे. गेल्यावर्षीपेक्षा १२ टक्के साठा घटला आहे. गणेशोत्सवानंतर पावसाने ओढ दिली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिले तर पाणी कपातीचे संकट येणार आहे.

पाणी कपातीचे नियोजन नाही

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चार वर्षांपासून दिवसाआड पाणी सुरू आहे. पावसाळ्यापर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे तूर्तास आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन नाही. पाणीसाठा कमी झाल्यास जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा

मावळातील पवना धरणातून आता जेवढे पाणी सोडले जाते, तेवढीच मागणी राहिली तर मेपर्यंत पाणी पुरेल. त्यापेक्षा मागणी कमी झाली तर जुलै-ऑगस्टपर्यंत पाणी पुरवता येईल. मावळातील पवना धरणामध्ये गेल्यावर्षी याच महिन्यामध्ये ९० साठा होता. तो आता कमी झाला आहे.

- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाDamधरण