शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

रसायनांचेच पाणी..! प्रदूषणाचे घटक पिण्याच्या पाण्यात?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 8, 2025 16:05 IST

पवनेचे प्रदूषित पाणी शुद्ध करण्यासाठी दररोज २ हजार ५०० टन क्लोरिन गॅस

- ज्ञानेश्वर भंडारेपिंपरी : शहरात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टँकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील ३० लाख नागरिकांना पवना नदीतून उचललेले प्रदूषित पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत.

महापालिकेने पवना नदीतील पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. शिवाय शहरातील नागरिकांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्यासाठी बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्नदेखील १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना महापालिकेकडून प्रदूषित पाण्यावर रसायनांचा मारा करूनच द्यावे लागत आहे. पण, महापालिकेने पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

जलशुद्धीकरण करण्यासाठी रसायनांचा उतारा

शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांना पिण्यायोग्य पाणी देण्यासाठी निगडीच्या सेक्टर २३ मध्ये सन २०२० -२०२१ मध्ये वर्षभरासाठी १५० टन ब्लिचिंग पावडर लागली. तीदेखील शिल्लक राहिली. आता २०२३ - २०२४ मध्ये वर्षभरासाठी ३५० ते ४०० टन ब्लिचिंग पावडर लागली. पावसाळ्यात दररोज २ किलो तुरटी लागत होती. ती आता दररोज ८ किलो लागत आहे. पूर्वीचे टीडीएसचे प्रमाण ६० ते ७० पीपीएम होते. ते आता १०० ते ११० पीपीएमपर्यंत गेले आहे.

बंदिस्त जलवाहिनी आवश्यक

महापालिकेने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प २००८ मध्ये हाती घेतला. मात्र, २०११ मध्ये मावळातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तो रखडला. आता राज्य सरकारने प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनीचा मार्ग मोकळा झाला आहे. थेट पवना धरणातून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात ४८० एमएलडी पाणी बंदिस्त जलवाहिनीतून आणण्यात येणार आहे. धरण ते निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत अशा एकूण ३४.७१ किलोमीटर अंतराची समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. त्यापैकी महापालिका हद्दीतील ४.४० किलोमीटर भूमिगत जलवाहिनीचे काम पूर्ण झाले होते. पवनेच्या प्रदूषणामुळे बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तातडीने होणे आवश्यक आहे.

पवना नदी उगम स्थानापासून रावेत उपसा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. नागरिकांना पिण्यायोग्य पाणी आम्ही देत आहोत. परंतु, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक रसायनांचा वापर होऊ लागला आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषणविरहित पाणी मिळण्यास मदत होईल. - प्रशांत जगताप, मुख्य रसायनी, जलशुद्धीकरण केंद्र, निगडी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेHealthआरोग्यWaterपाणीwater pollutionजल प्रदूषण