शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

महापालिकेच्या चुकीमुळे नागरिकांच्या घरात पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:11 IST

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष व हलगर्जीपणा समोर आला आहे.

बोपखेल : येथील रामनगर भागात पहाटे पाचच्या सुमारास झोपलेल्या नागरिकांना आपण पाण्यावर तरंगण्याची अनुभूती आली. खडबडून जागे झालेल्या नागरिकांना नेमके समजेनाच की घरात पाणी कसे आले. पाऊसही पडला नाही मग जमिनीतून पाणी कसे आले. काही नागरिक भीतीने घराच्या बाहेर आले व पाणी नेमके कुठून येत आहे याचे कारण शोधले असता महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नवीन जलवाहिनीचे काम या भागात केले गेले होते. याच कामात केले गेलेले दुर्लक्ष व हलगर्जीपणा समोर आला आहे.

नवीन जलवाहिनी जोडल्या नंतर वाहिनीचा शेवटचे तोंड बंद केले नव्हते. त्यामध्ये प्लास्टिक गोणीचा बोळा कोंबून तसेच बुजवण्यात आले होते. पहाटे पाणी सोडल्यावर हे पाणी जमिनीतून थेट येथील आठ ते दहा घरांमध्ये शिरले. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्य भिजले त्यामुळे येथील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे केलेल्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला आहे. पाणी पुरवठा विभागास संपर्क केला असता हे सर्व चुकून झाले अशी माहिती मिळाली.

पाणी पुरवठा कर्मचाऱ्यास माहिती मिळाल्यावर पाणी पुरवठा बंद करण्यात आला मात्र तो पर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते. आता या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. या सर्व घटनेमुळे महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीbopkhelबोपखेल