शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

वणव्याने डोंगर झाले ओसाड, वन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 03:12 IST

मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

कामशेत - मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.मावळ तालुक्यात नाणे, पवन, आंदर मावळासह अनेक भाग मागील काही वर्षांपूर्वी घनदाट जंगले, वनराई व नैसर्गिक साधनसामग्रीने स्वयंपूर्ण होता. मात्र, बेसुमार वृक्षतोड, जाणीवपूर्वक लावलेले वनवे, डोंगरांवर होणारे उत्खनन आदी कारणांमुळे मावळ तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळख असताना ती कालांतराने हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी धो धो पडणारा पाऊसही आता मोजूनमापून पडत आहे. मावळातील विविध भागांत जाताना गर्द झाडी असायची. आता मात्र सावली मिळण्यासाठी एखादे झाडही मिळणे मुश्कील झाले आहे. याची कारणे शोधण्यात व त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला वेळ नसला, तरी काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी संघटना वृक्षारोपणापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत जबाबदारी उचलताना अनेक ठिकाणी दिसत आहेत.वन विभागाचे अधिकारी फक्त कागदोपत्री काम करीत असल्याने मावळातील वणवेही केवळ कागदांवर शिल्लक राहिले आहेत.मावळातील वनक्षेत्राची दोन विभागांत विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये वडगाव विभागांतर्गत साधारण १० हजार ६६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यात १२९ गावांचा समावेश आहे. हे वनक्षेत्र सांभाळण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १३ वनरक्षक, ३ वनपाल, तर १८ वनमजूर काम करतात. शिरोता विभागात साधारण १२ हजार ६१३ हेक्टर वनक्षेत्र असून, त्याकडे लक्ष देण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १४ वनरक्षक, ३ वनपाल व १५ वनमजूर कार्यरत आहेत. एवढे लोक कार्यरत असतानादेखील मावळात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व वनाचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या वनरक्षकांचे खिसे गरम करून, शिवाय वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांना मेजवानी देऊन त्यांची मर्जी सांभाळल्यास तुम्ही काहीही करू शकता, असे काही वन्य प्राणिप्रेमी व पर्यावरणवादी नागरिक उपहासाने म्हणत आहेत.मागील वर्षी मावळात एक लाख वीस हजार झाडे लावण्यात आली; पण त्यातील किती झाडे जगली याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसावी. कारण शासनाने केवळ वृक्षलागवड केली. मात्र त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली नाही व या वर्षी साधारणत: साडेतीन ते चार लाख झाडे लावण्यात येणार आहेत. पण त्यांच्याही संगोपनाचे नियोजन केलेले नसल्याने शासन वृक्ष लागवडीसाठी करीत असलेला खर्च हा व्यर्थ जात आहे. वणव्यांमुळे जैवविविधता नष्ट होते हे सांगणाºया वन विभागाचा ढिसाळ कारभारच यासाठी जबाबदार आहे. अपुरी व अद्ययावत नसलेली साधनसामग्री, कामाच्या बाबतीत उदासीनता, त्याचप्रमाणे स्थानिकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन आदी कारणे काही पर्यावरणप्रेमी सांगतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगलfireआग