शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:58 IST

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत

पिंपरी : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण, त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली आहे. गद्दारांना जाब विचारणा‍ऱ्यांच्या मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्यांच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.  राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाल्हेकरवाडी येथे केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी  ठाकरे म्हणाले, राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले. त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुस‍ऱ्या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.’’

पन्नास खोके एकदम ओके

ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाषणात सहभागी करून घेतले. हे सरकार कोणते आहे? त्यावर कार्यकर्त्यांनी आवाज दिला, खोके सरकार.’’ कसे? असे विचारले. त्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. त्यानंतर वेदान्ता प्रकल्प, एअर बस प्रकल्प आणि आमदार कोठे नेले, त्यावर कार्यकर्त्यांनी ‘गुजरातला असे उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, ‘‘. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलीच्छ राजकारण राज्यात घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. आम्ही कधीही खोक्यांना हात लावला नाही. पण त्यांच्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ अशी टीका होते. गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चाळीस वार केले. पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर वार समोरून करायला हवा. महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान सरकारला मान्य आहे. लोकशाहीची खून केला जात आहे. जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला जात आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत. महाशक्ती विरोधात जनशक्तीची गरज आहे.’’

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी