शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:58 IST

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत

पिंपरी : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण, त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली आहे. गद्दारांना जाब विचारणा‍ऱ्यांच्या मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्यांच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.  राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाल्हेकरवाडी येथे केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी  ठाकरे म्हणाले, राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले. त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुस‍ऱ्या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.’’

पन्नास खोके एकदम ओके

ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाषणात सहभागी करून घेतले. हे सरकार कोणते आहे? त्यावर कार्यकर्त्यांनी आवाज दिला, खोके सरकार.’’ कसे? असे विचारले. त्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. त्यानंतर वेदान्ता प्रकल्प, एअर बस प्रकल्प आणि आमदार कोठे नेले, त्यावर कार्यकर्त्यांनी ‘गुजरातला असे उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, ‘‘. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलीच्छ राजकारण राज्यात घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. आम्ही कधीही खोक्यांना हात लावला नाही. पण त्यांच्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ अशी टीका होते. गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चाळीस वार केले. पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर वार समोरून करायला हवा. महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान सरकारला मान्य आहे. लोकशाहीची खून केला जात आहे. जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला जात आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत. महाशक्ती विरोधात जनशक्तीची गरज आहे.’’

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी