शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 17:58 IST

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत

पिंपरी : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण, त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली आहे. गद्दारांना जाब विचारणा‍ऱ्यांच्या मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्यांच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.  राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाल्हेकरवाडी येथे केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी  ठाकरे म्हणाले, राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले. त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुस‍ऱ्या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.’’

पन्नास खोके एकदम ओके

ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाषणात सहभागी करून घेतले. हे सरकार कोणते आहे? त्यावर कार्यकर्त्यांनी आवाज दिला, खोके सरकार.’’ कसे? असे विचारले. त्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. त्यानंतर वेदान्ता प्रकल्प, एअर बस प्रकल्प आणि आमदार कोठे नेले, त्यावर कार्यकर्त्यांनी ‘गुजरातला असे उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, ‘‘. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलीच्छ राजकारण राज्यात घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. आम्ही कधीही खोक्यांना हात लावला नाही. पण त्यांच्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ अशी टीका होते. गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चाळीस वार केले. पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर वार समोरून करायला हवा. महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान सरकारला मान्य आहे. लोकशाहीची खून केला जात आहे. जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला जात आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत. महाशक्ती विरोधात जनशक्तीची गरज आहे.’’

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी