शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:28 IST

नागरिकांना करावी लागते भटकंती; महापालिकेचे दुर्लक्ष

रावेत : यंदा पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी रावेतकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थितीरावेतच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये आहे.रावेत येथील गावठाण, प्राधिकरण सेक्टर २९, ३२ जाधव वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवेनगर आदी परिसरासह पाणीपुरवठा होणाºया भागात पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे विघ्न ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढे पाणी नळास येत होते; परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे.काही भागात पुरेसा, तर काही भागात अपुºया दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना दुरून पाणी आणावे लागत आहे. प्रभाग १६ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडिक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठारावेतच्या प्राधिकरण सेक्टर २९, ३२ मधील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्या तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.रावेतसह प्रभागातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. पाणीपुरवठा तातडीची सेवा असताना अधिकारी त्यांचा फोन बंद ठेवतात. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शहराला रावेत येथून होणारा पाणीपुरवठा बंद करून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येईल.- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवकमहापालिकेकडून शहरातील सर्वच भागांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. कमी किंवा अनियमित पाणीपुरवठा नाही. काही भागातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम सुरू आहे. अशा जलवाहिन्यांमुळे गळती होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई