शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पाणी विकत घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 02:28 IST

नागरिकांना करावी लागते भटकंती; महापालिकेचे दुर्लक्ष

रावेत : यंदा पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असे बोलले जात होते. मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी रावेतकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थितीरावेतच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये आहे.रावेत येथील गावठाण, प्राधिकरण सेक्टर २९, ३२ जाधव वस्ती, शिंदे वस्ती, भोंडवेनगर आदी परिसरासह पाणीपुरवठा होणाºया भागात पाणी कमी दाबाने आणि अपुºया प्रमाणात येत असल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे विघ्न ओढवले आहे. काही दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होणाºया पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.रावेत परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. गेल्या काही दिवसांपर्यंत नियमितपणे सर्वांना पुरेल एवढे पाणी नळास येत होते; परंतु मागील काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने आणि अपुरा पुरवठा होत आहे.काही भागात पुरेसा, तर काही भागात अपुºया दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.काही भागात अत्यंत कमी पाणी येत असल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. काही दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना दुरून पाणी आणावे लागत आहे. प्रभाग १६ मध्ये दिवसेंदिवस पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी व दररोजच्या वापरासाठी लागणारे पाणी या भागातील नागरिकांना मिळत नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. वाल्हेकरवाडी आणि परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने चालू करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत नाही झाला, तर कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडिक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठारावेतच्या प्राधिकरण सेक्टर २९, ३२ मधील काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्ध्या तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.रावेतसह प्रभागातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. पाणीपुरवठा तातडीची सेवा असताना अधिकारी त्यांचा फोन बंद ठेवतात. याबाबत आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास शहराला रावेत येथून होणारा पाणीपुरवठा बंद करून पूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात येईल.- मोरेश्वर भोंडवे, नगरसेवकमहापालिकेकडून शहरातील सर्वच भागांमध्ये नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. कमी किंवा अनियमित पाणीपुरवठा नाही. काही भागातील जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलण्याचे काम सुरू आहे. अशा जलवाहिन्यांमुळे गळती होते. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा झाल्यास नागरिकांनी त्वरित माहिती द्यावी. त्याबाबत महापालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात येतील.- रामदास तांबे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईwater scarcityपाणी टंचाई