शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:15 IST

गेल्या वर्षभरापासून शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार . पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन

पिंपरी : शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे विविध भागातील नागरिक हैराण झाले आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापालिकेत बैठकही झाली. मात्र, पाणीप्रश्न सुटलेला नाही. या नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांसह नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आकुर्डीत मोठ्याप्रमाणावर नागरिक जमले होते. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुशिलकुमार लवटे आणि अन्य सहकारी उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आमच्याच भागात पाणी प्रश्न का? असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावेळी अण्णा कुऱ्हाडे ,सय्यद इखलास, प्रकाश परदेशी, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे आदी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुमच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी कालखंड लागेल असे सांगितले.कितीतरी दिवसांपासून हा प्रश्न जर प्रलंबित आहे. तो सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत तुमच्याकडून दरवेळी उडवाउडवीची कसे दिली जात असल्याचे सांगत अधिकाऱ्याला नगरसेवक शेख यांनी काळे फासले. याबाबत शेख म्हणाले, दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या भागात गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, अशी आश्वासने अनेकदा दिली. मात्र, पुढे काहीच झाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. महापालिकेचा कर नियमित भरूनही पाणी मिळत नाही. हा अन्याय आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊनही काहीही सुधारणा होत नव्हती. दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे पाणी हक्काचे आहे. हा मुलभूत अधिकार आहे. नाईलाज झाल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. याची दखल महापालिकेने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. या भागातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करावा.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीEmployeeकर्मचारी