शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पिंपरीत नगरसेवकाने पालिकेच्या अधिकाऱ्याला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:15 IST

गेल्या वर्षभरापासून शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली.

ठळक मुद्देप्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार . पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन

पिंपरी : शहरातील अनियमित आणि अपुऱ्या पाणीपुरवठयामुळे विविध भागातील नागरिक हैराण झाले आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोठ्याप्रमाणावर पाणी टंचाई असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत महापालिकेत बैठकही झाली. मात्र, पाणीप्रश्न सुटलेला नाही. या नागरिकांच्या प्रश्नावर अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त नागरिकांसह नगरसेवक जावेद शेख यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याला काळे फासले. आज सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास आकुर्डीत मोठ्याप्रमाणावर नागरिक जमले होते. त्यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुशिलकुमार लवटे आणि अन्य सहकारी उपस्थित होते. त्यावेळी नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आमच्याच भागात पाणी प्रश्न का? असा प्रश्नही उपस्थित केला. त्यावेळी अण्णा कुऱ्हाडे ,सय्यद इखलास, प्रकाश परदेशी, तोहित शेख, वसंत सोनार, हरिभाऊ हांडे, बयाजी तोरणे आदी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुमच्या परिसरातला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी कालखंड लागेल असे सांगितले.कितीतरी दिवसांपासून हा प्रश्न जर प्रलंबित आहे. तो सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत तुमच्याकडून दरवेळी उडवाउडवीची कसे दिली जात असल्याचे सांगत अधिकाऱ्याला नगरसेवक शेख यांनी काळे फासले. याबाबत शेख म्हणाले, दत्तवाडी, विठठलवाडी, श्रीकृष्ण नगर, ओटो स्कीम, मोहननगर, काळभोरनगर या भागात गेल्या वर्षभरापासून पाण्याच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, बैठका घेतल्या. मात्र, केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आठ दिवसात काम होईल, अजून दोन दिवस द्या, अशी आश्वासने अनेकदा दिली. मात्र, पुढे काहीच झाले नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वेळ मारून नेत आहेत. महापालिकेचा कर नियमित भरूनही पाणी मिळत नाही. हा अन्याय आहे. अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊनही काहीही सुधारणा होत नव्हती. दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे पाणी हक्काचे आहे. हा मुलभूत अधिकार आहे. नाईलाज झाल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. याची दखल महापालिकेने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी. या भागातील पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करावा.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीEmployeeकर्मचारी