शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजा’ - रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:23 IST

वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय

तळेगाव दाभाडे : वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. त्यासाठी नगरपालिकेतील रिक्त ४५ जागांसह प्रलंबित विकासकामांना लवकर मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आमदार बाळा भेगडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते शहरातील सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. त्या वेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर भेगडे होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, निमंत्रक चंद्रभान खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, उद्योजक किशोर आवारे, नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, गणेश खांडगे, अमोल शेटे, किशोर भेगडे, संग्राम काकडे, नीता काळोखे, मुख्याधिकारी वैभव आवारे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, गणेश भेगडे, रवींद्र आवारे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले,‘‘राज्यातील पहिली ग्रीनसिटी करण्याचा मान केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी तळेगावला दिला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची तळेगावला दत्तक घेण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूर्ण करावी. प्रास्ताविक उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले. बांधकाम समितीचे सभापती अरुण भेगडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षण समिती सभापती संग्राम काकडे यांनी केले. (वा. प्र.)वतननगरजवळील रेल्वे अंडरग्राउंड बायपासच्या भूमिपूजनासह जिजामाता चौकातील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, एक्स्प्रेस फीडरचे लोकार्पण, भुयारी गटर, तसेच कचरा डेपो रस्ता आणि एलईडी दिव्यांच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार