शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका

By विश्वास मोरे | Updated: January 27, 2025 17:44 IST

स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे

पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये आम्ही हरलो, त्याची कारणे काय आहेत सर्वांना माहीत आहेत. पण, तरीही या पराभवाने खचून न जाता आगामी आणि इतर निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. या निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो केवळ मुंबई पुरता आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे.  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवडमध्ये शहरात आले असता राऊत बोलत होते.

म्हणजे महाविकास आघाडी संपुष्टात,  असा अर्थ काढणे चुकीचा!

राऊत म्हणाले, ''स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे. मुंबई वगळता पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहरात एकत्र लढण्याचा सर्वांचाच विचार आहे. त्या त्या शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून आम्ही तिथला निर्णय घेऊ.''

त्यांना पर्यायही नव्हता!

आमदारांचा मान राखून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं.  यावर संजय राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांचे भाजप हाय कमांड आहे. आणि हाय कमांडने त्यांना आदेश दिला तो त्यांना मानावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हायकामांचा आदेश मानला. त्याच हाय कमांडचा शिंदे यांनी आदेश पाळला. त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता. उपमुख्यमंत्री पद स्वीकारला नसतं, तर त्यांनी काय केलं असतं?  आपली कातडी वाचवण्याशिवाय , पुढचे खटले थांबवण्यासाठी, पुढे होणार त्रास होऊ नये यासाठी त्यांना सरकार मध्ये जाणे भाग होते, ते गेले. ज्या पद्धतीने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडली गेली त्याच पद्धतीने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही पक्ष तोडला जाईल, भाजपला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. ते देशातही पक्ष तोडतील. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाही पक्ष ते तुटतील. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना राऊत म्हणाले, 'मनोज जरांगे हे लढवय्ये नेते आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. 

त्यांनी काय पकोडे तळावेत का?

आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली असली तरी मोजक्या जागांसाठी हजारो इंजिनियर लाईन लावतात. यावरून बेरोजगारी किती आहे, हे स्पष्ट होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढावी. साडेपाच हजार आयटी कर्मचारी नोकरीसाठी रांगेत उभे राहतात. त्यांनी काय पकोडे तळावेत का?' जातोय पण त्याला उत्तर नाही!

दोन्ही ठाकरे एकत्र येतात का?  यावर संजय राऊत म्हणाले, 'हा प्रश्न गेली २५ वर्ष विचारला जातोय पण त्याला उत्तर नाही, आम्ही महाविकास आघाडी मध्ये आहोत शिवसेनेची एक भूमिका आहे जे पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी करतील त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही.'

विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा

नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत, स्वतःच्या लोकांना सोडायचे आणि विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा आहे.'

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरे