शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो मुंबई पुरता; संजय राऊतांची स्पष्ट भूमिका

By विश्वास मोरे | Updated: January 27, 2025 17:44 IST

स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे

पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये आम्ही हरलो, त्याची कारणे काय आहेत सर्वांना माहीत आहेत. पण, तरीही या पराभवाने खचून न जाता आगामी आणि इतर निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. या निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला तरी तो केवळ मुंबई पुरता आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली आहे.  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवडमध्ये शहरात आले असता राऊत बोलत होते.

म्हणजे महाविकास आघाडी संपुष्टात,  असा अर्थ काढणे चुकीचा!

राऊत म्हणाले, ''स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली असा अर्थ काढणे चुकीच आहे. मुंबई वगळता पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहरात एकत्र लढण्याचा सर्वांचाच विचार आहे. त्या त्या शहरातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून आम्ही तिथला निर्णय घेऊ.''

त्यांना पर्यायही नव्हता!

आमदारांचा मान राखून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं.  यावर संजय राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांचे भाजप हाय कमांड आहे. आणि हाय कमांडने त्यांना आदेश दिला तो त्यांना मानावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हायकामांचा आदेश मानला. त्याच हाय कमांडचा शिंदे यांनी आदेश पाळला. त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता. उपमुख्यमंत्री पद स्वीकारला नसतं, तर त्यांनी काय केलं असतं?  आपली कातडी वाचवण्याशिवाय , पुढचे खटले थांबवण्यासाठी, पुढे होणार त्रास होऊ नये यासाठी त्यांना सरकार मध्ये जाणे भाग होते, ते गेले. ज्या पद्धतीने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडली गेली त्याच पद्धतीने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही पक्ष तोडला जाईल, भाजपला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. ते देशातही पक्ष तोडतील. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाही पक्ष ते तुटतील. मनोज जरांगे यांच्या उपोषणावर बोलताना राऊत म्हणाले, 'मनोज जरांगे हे लढवय्ये नेते आहेत, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. 

त्यांनी काय पकोडे तळावेत का?

आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली असली तरी मोजक्या जागांसाठी हजारो इंजिनियर लाईन लावतात. यावरून बेरोजगारी किती आहे, हे स्पष्ट होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत श्वेतपत्रिका काढावी. साडेपाच हजार आयटी कर्मचारी नोकरीसाठी रांगेत उभे राहतात. त्यांनी काय पकोडे तळावेत का?' जातोय पण त्याला उत्तर नाही!

दोन्ही ठाकरे एकत्र येतात का?  यावर संजय राऊत म्हणाले, 'हा प्रश्न गेली २५ वर्ष विचारला जातोय पण त्याला उत्तर नाही, आम्ही महाविकास आघाडी मध्ये आहोत शिवसेनेची एक भूमिका आहे जे पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी करतील त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही.'

विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा

नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत, स्वतःच्या लोकांना सोडायचे आणि विरोधकांना पकडायचे? यात त्यांचा हातखंडा आहे.'

टॅग्स :PuneपुणेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरे