शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

राज ठाकरेंना भाजपात घेऊन काहीही फायदा नाही; रामदास आठवले यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 20:49 IST

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमते पण मत किती मिळतात, हा खरा प्रश्न

पिंपरी : राज ठाकरे यांना भाजपत घेऊ नये, या विचारांचा मी आहे. त्यांच्या फक्त सभांना गर्दी जमते. मत किती मिळतात, हा खरा प्रश्न आहे. त्यांना घेऊन भाजपला काहीही फायदा नाही, अशी स्पष्ट भूमिका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड शहरात मांडली.

पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईत मशिदींवरील भोंग्यांवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली. त्यावर आठवले म्हणाले, मशिदींवरील भोंगे हे मुस्लिम बांधवांची परंपरा आहे. पूर्वी हे भोंगे ऐकून आपल्याला जाग येत असे. त्यांच्या भोंग्यांसमोर हनुमान चालिसा लावणे योग्य नाही. दोन्हीही एकमेकांच्या समोर भोंगे न लावता एकमेकांना त्रास होणार नाही, असे भोंगे लावावेत. 

राज ठाकरे नाही, शिवसेना फायद्याची

शिवसेनेवर टीका करताना आठवले म्हणाले, राज ठाकरे यांचा भाजपला कोणताही फायदा नाही. त्यांची भाषणे ऐकायला लोक येतात. मत किती मिळतात, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपत राज ठाकरे यांना घेण्यास रिपब्लिकनचा विरोध आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी युती केली ही चांगली बाब नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनेने भाजपबरोबर यावे, मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्मुला करावा, यासाठी मी आग्रही आहे. १९९२ मध्ये काँग्रेस आरपीआय युतीने चमत्कार केला होता. तसाच शिवसेना आणि भाजप-आरपीआयने एकत्र येऊन सरकार स्थापावे.  

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जातीपातीचे राजकारण करतात

राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्यावर आठवले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे जातीपातीचे राजकारण करतात, असे मी म्हणणार नाही. मात्र, कोरेगाव येथे झालेल्या घटनेच्या वेळी आजूबाजूच्या गावांतील राष्ट्रवादीच्या लोकांनी जातीपातीचे राजकारण केले. राष्ट्रवादीचे स्थानिक लोक राजकारण करतात, असे माझे मत आहे. वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षात यावे, आम्ही बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा