शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

कानठळ्या बसवणारा गोळीबाराचा आवाज; अंगावर शहारे, पर्यटकांकडून डोळ्यासमोरची घटना कथन

By विश्वास मोरे | Updated: April 23, 2025 20:31 IST

गोळीबाराचा आवाज कानी आला, सुरुवातीला वाटलं की, फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाला अन् आमचाही गोंधळ उडाला.

पिंपरी : दुपारच्या सुमारास पहलगाम येथील बैसरण घाटी भागात कानठळ्या बसवणारे गोळीबाराचे आवाज सुरु झाले. काही समजण्याच्या आतच अचानक लोकांची पळापळ सुरू झाली, आम्हीही जीवाच्या आकांताने पुन्हा आमच्या हॉटेलच्या दिशेने पळालो, त्यावेळी कळलं कि दहशतवादी हल्ला झाला आहे, अंगावर काटाच आला, असे सांगत होते चिंचवडवरून पहलगामला गेलेले पर्यटक भाऊसाहेब दरंदले. पहलगाममधील घडलेल्या घटनेची कहाणी त्यांनी कथन केली. 

पिंपरी- चिंचवड शहरातील चिंचवडमधील जेष्ठ नागरिक, मुले आणि महिला असा ३२ एक समूह, तर ताथवडे, पुनावळे येथील मी १२ जणांचा आणि वाल्हेकरवाडीतील ३ जण, आणि आकुर्डीतील ३ जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. सर्वजण सुखरूप आहेत. चिंचवडमधील ग्रुप १३ एप्रिलला चिंचवडवरून जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेला होता. मंगळवारी दुपारी ते पहलगामला होते. बैसरण घाटी येथे मिनी स्वित्झरलँड म्हणून एक पॉईंट आहे. तिथे हे सर्व सहकारी निघाले होते. केवळ शंभर ते दीडशे मीटरचे अंतर शिल्लक राहिलं होतं आणि अचानक गोळीबार सुरू झाला. 

अनुभव सांगताना भाऊसाहेब दरंदले म्हणाले, 'गोळीबाराचा आवाज कानी आला. सुरुवातीला वाटलं की फटाके वाजत असतील. मात्र, पुन्हा जोर -जोराने आवाज सुरू झाले आणि लोकांची पळापळ सुरू झाली. आमचाही गोंधळ उडाला. काय करावे कळेना. म्हणून आम्ही सर्वजण जीवाच्या आकांताने रस्ता दिसेल तिकडे जाऊ पळू लागले. तसे पहिले तर हा सर्व भाग कच्च्या रस्त्याचा आहे. आम्ही सगळे काही वेळातच हॉटेलमध्ये परतलो. त्यावेळेस कळाले की दहशतवादी हल्ला झाला आहे आणि त्यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. त्यावेळी अंगावर शहारे आले. जशी वेळ पुढे सरकत होती. तशा प्रशासनाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलीस मदतीसाठी धावाधाव करीत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लष्करीपथकही दाखल झाले. सुरुवातीला आम्ही घाबरलो होतो. मात्र आम्ही सर्वजण सुखरूप होतो. वास्तविक सुरुवातीला किती मोठा किती मोठा हल्ला आहे. याबाबत माहिती मिळत नव्हती. दरम्यान आमच्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या कुटुंब यांचे फोन येऊ लागले. आमच्या घरच्या सर्वांना चिंता होती. त्यामुळे बुधवारी सकाळीच आम्ही राजोरीच्या दिशेने निघालो. मात्र, या मार्गावर खूप ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. तसेच वाहतूकोंडीही झाली आहे.  त्यामुळे आम्हाला झेलम गाडी पकडणे अवघड वाटत आहे.' 

मदतीसाठी गुहार 

पहलगाम ते राजोरी रस्त्यावर अनेक ठिकाणी तपासणी सुरु आहे. तसेच रस्ते अरुंद असल्याने वाहतूककोंडी झाली आहे. त्यामुळे चिंचवडचे पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुखरूप आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहळ, खासदा र डॉ अमोल कोल्हे आणि भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी तेथील मदत कक्षला माहिती दिली आहे. तेथील येथील प्रशासनाची संवाद साधून पर्यटकाना पुन्हा चिंचवडला आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाtourismपर्यटनJammu Kashmirजम्मू-काश्मीरFamilyपरिवार