शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

शाळेच्या धोकादायक इमारतीच्या आवारात विद्यार्थ्यांचा होतोय वावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 14:21 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

ठळक मुद्देअपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता धोकादायक इमारतीचा फलकदुघर्टना घडल्यास जबाबदार कोण?इमारत हटविण्याकडे दुर्लक्ष

शीतल मुंडे-

पिंपरी : भोसरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेची श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमधून समोर आले आहे. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेने शाळेच्या आवारातच पत्र्याचे शेड उभारून वर्गखोल्या तयार केल्या. तरीही विद्यार्थी येथील धोकादायक इमारतीमध्ये ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, ही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळेविद्यार्थ्यांच्या पालक संताप व्यक्त करीत आहेत.........धोकादायक इमारतीचा फलकमहापालिकेच्या ई-प्रभाग कार्यालयाने दि. ३ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला भोसरी येतील शाळेची इमारत धोकादायक असल्याचे पत्र दिले होते. त्यानंतर दि. २९ सप्टेंबर २०१९ रोजी माध्यमिक शिक्षण विभागाने शाळा भरवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. तीन महिन्यांपासून बाजुच्या पत्र्याच्या शेडमध्ये शाळा भरत आहे. परंतु, विद्यार्थ्यांचा वावर हा धोकादायक इमारतीच्या आवारात असतो. या  इमारतीमध्ये विद्यार्थी मध्यान्य भोजन घेतात, तसेच खेळतात.............दुघर्टना घडल्यास जबाबदार कोण?महापालिका प्रशासनाने इमारत धोकादायक असल्याचा सूचना फलक लावून हात वर केले आहेत. मात्र, शाळेची इमारत स्ट्रक्चरल आॅडिटनुसार सुरक्षित नसून, परिसरात वापर करण्यास मनाईचा सूचना फलक उभारून प्रशासन जबाबदारी झटक आहे.  मात्र, बाजुच्या पर्यायी शाळेतील विद्यार्थी या इमारतीमध्ये ये-जा करत असतात. संभाव्य धोका महापालिका प्रशासनाला, शाळा प्रशासनाला माहीत असतानादेखील कोणीही ही जबाबदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सजग पालक व नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...........इमारत हटविण्याकडे दुर्लक्षमहापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शाळेची धोकादायक इमारत पाडण्याबाबत स्थापत्य विभागाला पत्र देण्यात आले आहे. मात्र स्थापत्य विभाग शिक्षण विभागाच्या पत्राला केराची टोपली दाखवत आहे. इमारत हटविण्याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करीत टोलावाटोलवी सुरू केल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनातील दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याचेही समोर आले आहे........खबरदारीची आवश्यकताशाळेची इमारत धोकादायक आहे. तरीदेखील त्या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विद्यार्थी धोकादायक इमारतीमध्ये जाऊ नयेत म्हणून शिक्षकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा काही पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. .....श्री छत्रपती शिवाजीमहाराज माध्यमिक विद्यालयाची इमारत धोकादायक आहे़ त्यामुळे शाळेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.  धोकादायक इमारत हटविण्याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाकडून स्थापत्य विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. इमारत हटविण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. - पराग मुंडे, प्रशासकीय अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, महापालिका  ......

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थी