शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 5, 2015 03:15 IST

येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी

देहूगाव : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांसाठी ७५ जण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. सहा आॅगस्ट रोजी देहूचे नवे कारभारी नक्की कोण असणार याचा फैसला होणार आहे.उमेदवारसमर्थक व घरातील सुवासिनींनी मतदान यंत्राची पूजा करून मतदानाला सुरुवात केली. पहिल्या दोन तासांतच उमेदवारांच्या घरातील मतदारांनी व जवळच्या कार्यकर्त्यांनी मतदान करून घेतले. काही कार्यकर्ते मतदारांना घरोघरी जाऊन मतदानाचे आवाहन करीत होते. त्यामुळे पहिल्या दोन तासांतच मतदानाचा वेग चांगला होता. दहाच्या सुमारास वॉर्ड क्रमांक तीन, पाच व सहामध्ये काहीसे मंद गतीने मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाचा वेगही मंदावला होता आणि मतदान कर्मचारी मतदारांची वाट पाहत असल्याचे चित्र होते. दुपारी तीन वाजल्यानंतर मतदार खऱ्या अर्थाने घराबाहेर पडले आणि मतदान केंद्रांच्या बाहेर रांग लागण्यास सुरुवात झाली. काही उमेदवार १०० मीटर अंतराच्या आत, तर काही उमेदवारांचे समर्थक मतदान इमारतीच्या परिसरात उभे राहून मतदारांना मार्गदर्शन करताना दिसत होते. पोलिसांना बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. काही कार्यकर्ते वॉर्डातील वयस्कर लोकांना आणत होते, मतदान केंद्र लांब असल्याने काही कार्यकर्ते वाहने घेऊन आणण्याचे काम करीत होते. मतदारांना मतदान स्लिप देण्यासाठी मतदान बूथवर लॅपटॉप, मोबाईल या साधनांचा वापर करून तत्काळ मतदारयादीचा नंबर व खोली क्रमांक देत होते. विठ्ठलनगरमधील पाच व सहा वार्डमध्ये उमेदवारही अनुक्रमे १७ व १४ होते. त्यामुळे त्यांचे देहू-आळंदी रस्त्यावर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी बूथ रस्त्याच्या कडेला टाकलेले असल्याने कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने वाहतुकीची दिवसभर कोंडीच होती. त्यामुळे वाहतुकीचा बोजबारा उडाला होता. दुपारच्या वेळी सर्वच उमेदवारांच्या बूथमधीलकार्यकर्त्यांना व मतदान प्रतिनिधींना नाष्टा पुरविण्याचे काम करत होते. मतदानाची वेळ संपत आली तशी उमेदवारांची मतदान करून घेण्यासाठी तगमग सुरू झाली. परिणामी चार वाजल्यानंतर वार्ड क्रमांक २, तीनच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पोलिसांनाही मतदानप्रक्रिया, वाहतूक व्यवस्था, कार्यकर्त्यांना आवर घालणे हे जिकिरीचे होत होते. प्रशासकीय यंत्रणाही सतर्क होती. (वार्ताहर)