शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाहतूक पोलिसांना झळा; चौकांत बूथची नाही व्यवस्था, आरोग्यावर होतोय परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 4:29 AM

शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. त्यांना अक्षरश: उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

- प्रकाश गायकरपिंपरी : शहराचे तापमान ३८ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. अशा कडक उन्हात वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांची दमछाक होते. त्यांना अक्षरश: उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.शहरातील मुख्य चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस उभे असतात. परंतु उन्हाळ््यामध्ये भर उन्हात उभे राहूनच पोलिसांना काम करावे लागते. सगळ्याच चौकांत उन्हातच उभे राहून कर्तव्य करावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात येत नाही.प्रशासन गेल्या दोन वर्षांपासून चौकांमध्ये व वर्दळीच्या ठिकाणी बूथ उभे करण्याच्या विचाराधीन आहे. परंतु अद्याप प्रत्यक्षात काही बूथ उभे राहिले नाहीत. त्यामुळे खाली रस्तातापला असताना आणि वरून उन्हाच्या झळा लागत असताना वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसते.वाहतूक पोलीस भर उन्हात जबाबदारी पार पाडत असताना प्रशासन मात्र त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करीत आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बूथ उभारण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे बंदोबस्तावरील पोलिसांनाही या समस्यांचा सामना करावा लागतो.शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी वाहतूक पोलीस तापलेल्या रस्त्यावर उभे राहून जबाबदारी पार पाडत असतात; मात्र सोयी-सुविधांअभावी त्यांची प्रचंड गैरसोय होते. उन्हाळ्यात किमान सावलीची तरी सोय व्हावी, अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून बाळगली जात आहे.पोलिसांना बारा तास ड्युटी करावी लागते. त्यातील सकाळी ९ ते २ या भर उन्हाच्या काळात उन्हाच्या झळा अंगावर घेत ड्युटी करावी लागत असल्याने उन्हाचा चांगलाच चटका त्यांना बसतो. बºयाचशा चौकांमध्ये महिला पोलीसही भर उन्हातच वाहतुकीचे नियमन करताना दिसतात. बहुतेक पोलिसांना थकवा जाणवणे, भूक न लागणे, चक्कर येणे असे त्रास होतात. अनेक पोलिसांना वाढत्या उन्हाच्या त्रासामुळे नेत्ररोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, डोळ्यांची आग होणे असा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.पिंपरी चौकाजवळील लोखंडे कामगार भवन येथील वाहतूक नियंत्रण कक्षात पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. तेथे कार्यरत कर्मचाºयांना स्वखर्चाने पाण्याच्याबाटल्या विकत घ्याव्या लागतात. तीन वर्षांत बºयाचदा अर्ज देऊनही पिण्याच्या पाण्याची सोय अद्यापही महापालिकेने करून दिलेली नाही.बंदोबस्ताच्या वेळी उन्हातच बारा तास उभे राहून कर्तव्य पार पाडावे लागत असल्याने त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उन्हापासून बचाव करण्याची उपाययोजनाच नसल्याने त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस