शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू : शिवाजीराव आढळराव-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 18:29 IST

आपल्याला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अमर करायचे आहेत....

पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले प्रधान आहेत. त्यांच्या साथीला साथ देत आपल्याला पुढील येणारी अनेक वर्षे त्यांची ढाल बनून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अमर करायचे आहेत, त्यासाठी एकत्रित व्हा. आपण बाळासाहेबांचे सच्चे पाईक होऊन दाखवू'', असे प्रतिपादन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

निगडीतील सिझन बेंक्वेट हॉल येथे नुकताच (दि. १७) कामगार नेते इरफान सय्यद यांच्या पुढाकारातून विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात ''बाळासाहेबांची शिवसेना'' पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. यावेळी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, बाळासाहेब वाल्हेकर, नीलेश तरस, राजेश वाबळे, शैलाजी पाचपुते, सरिता साने, संभाजी शिरसाठ उपस्थित होते.

पुढे बोलताना आढळराव म्हणाले, २०१९ मध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापनेची वेळ आली. त्यावेळी मी अमेरिकेत होतो. उद्धव साहेबांना फोन करून आपण कुठेतरी चुकतोय? महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मत तरी जाणून घ्या, हे केल्याने काय होणार आहे. आपल्या हिताचं आहे? असे म्हणालो होतो. परंतु, ते तसे नाही, तुम्ही आल्यावर बोलू, असे म्हणून वेळ मारून नेली. साहेब मुख्यमंत्री होणार, याचा आम्हाला आनंद झाला होता. मात्र, हा आनंद महिनाभर टिकला नाही. सरकारची कार्यप्रणाली आणि वर्तवणूक पाहता सहा महिन्यांत आमचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे शिवसेनेला ताकद मिळालीच नाही.

इरफान सय्यद म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून राज्यभर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पक्षाबरोबर जोड़ले जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणखी उभारी मिळणार आहे. पुढील काही दिवसांत इतर पक्षांचे नगरसेवक आणि पदाधिकारीही पक्ष प्रवेश करतील. पिंपरी-चिंचवड महापालिका मित्रपक्षांसह काबीज करायची आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे