शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

पालकांच्या विसंवादामुळे शालेय विद्यार्थ्यांचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 3:15 AM

कुटुंबात आईवडिलांचे वाद; शहरात वाढल्या घरातून पळून जाण्याच्या घटना

- प्रकाश गायकर पिंपरी : कुटुंबात आईवडिलांचे एकमेकांशी प्रेमाचे व सलोख्याचे संबंध नसल्याने मुलांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. शालेय वयातील विद्यार्थी वेगळ्या मार्गावर जात असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. आईवडिलांना मुलांसाठी वेळ नसणे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण नाते नाही. मुले आणि पालकांमधील संवाद हरवत चालला आहे. घरात प्रेमळ व सकारात्मक वातावरण नसल्याने मुले भरकटताना दिसत आहेत. त्यातून नशेच्या आहारी व मौजमस्ती करण्यात अल्पवयीन मुले दंग होतात. घरात आई-बाबा एखादा शब्द बोलले तरी ही मुले टोकाचा निर्णय घेऊन घराबाहेर पडतात. उद्योगनगरीत मुले व मुली घरातून न सांगता पलायन करण्याच्या घटना वाढत आहेत. अलीकडच्या काळात आईवडील दोघांना कामासाठी घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे कुटुंबात मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे अल्पवयीन मुलांचे योग्य संगोपनाकडे दुर्लक्ष होते.त्यातून ईर्ष्या, द्वेष वाढत जातात. एखादी गोष्ट त्याच्याकडे आहे मग माझ्याकडे का नाही, असे प्रश्न मुलांना वेगळ्या मार्गावर घेऊन जात आहेत. त्यातून मग आईवडिलांसोबत छोट्या-छोट्या गोष्टींसाठी भांडणे करतात. कोणी समजून घेण्यासाठी नसल्याने एकलकोंडी होतात.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही मुले सराईतपणे करीत आहेत. स्मार्ट फोनमधील विविध अ‍ॅप्समुळे सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र आता हा स्मार्ट फोनच पालकांच्या चिंतेत भर टाकत आहे.कोवळ्या वयात पडतात प्रेमातशाळा, महाविद्यालयात झालेली ओळख स्मार्ट फोनमुळे अधिक घट्ट होते. लेटनाईट चॅटिंग करणे, विविध पोझमधील फोटो अपलोड करणे, मिनिटाला स्टेटस बदलणे हे मुलांना नवीन नाही. घरात मुलांना सकारात्मक प्रेम मिळत नाही. त्यामुळे कोवळ्या वयात मुले-मुली एकमेकांमध्ये जास्त जवळीक साधून प्रेमात पडतात. प्रपोज करणे, ब्रेक अप होणे हे शब्द शाळा, महाविद्यालयाच्या आवारात नित्याने ऐकायला मिळतात. विशिष्ट वयात प्रेमात पडल्यावर पालकही विरोध करणार नाहीत, मात्र कोवळ्या वयात प्रेमात पडलेल्या मुलांना पाहून घरचेही धास्तावले आहेत.आई-बाबांनाच धरतात वेठीसमुलांच्या मनासारखे झाले नाही तर मुले आई-बाबांनाच वेठीस धरतात. गेल्या आठवड्यात तीन शाळकरी मुली शाळेत जातो असे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. तेव्हा घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली आणि त्यानंतर पोलीस व पालकांची शोधाशोध सुरू झाली. मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना या मुलींना लोणावळा स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. केवळ सहल म्हणून त्या घराबाहेर पडल्या असल्याचे त्यांनी सांगितले.सुसंवादाची योग्य वेळ जाणावीआपले पाल्य अबोल होणे, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर सतत रमलेले असल्यास, अनेक भेटवस्तू घरात दिसू लागल्यास, वारंवार शाळा कॉलेज बुडवत असल्यास, सिनेमा हॉटेल येथील फेऱ्या वाढल्या असतील. तसेच चेहºयावर अतिभीती अथवा आनंद दिसू लागला असेल, मित्र परिवारातील एखाद्या मुलाकडे ऐपतीपेक्षा महागड्या गाड्या, कपडे, फोन दिसत असल्यास आपल्या लेकीला विश्वासात घेऊन अत्यंत मायेने तिच्याशी या विषयी संवाद सुरू करायला हवा.घरामध्ये एकेरी संवाद नको. संवाद दोन्ही बाजूने असला तरच अपेक्षित आशय एकमेकांपर्यंत पोहोचतो. मुलांना खूप काही सांगायचे असते. परंतु त्यांना ही संधी दिली नाही तर ओघाने त्यांचे ऐकणारे त्यांना प्रिय वाटू लागतात. काही विषय वर्ज्य असले तरीही आपल्या पाल्यासोबत निसंकोचपणे चर्चा करावी. प्रेम भावनेचा आधारे जर समाजकंटक ठरवून, सूड भावनेने मुलींना प्रेमाचे जाळ्यात अडकवत असतील, तर पालकांनी गांभीर्याने विचार करावा. - स्मिता कुलकर्णी, समुपदेशक

टॅग्स :relationshipरिलेशनशिपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड