शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:45 IST

कोरोना संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा

ठळक मुद्देपिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता असल्याने महिला पोलिसांनाही बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे.

नारायण बडगुजर 

पिंपरी: कोरोना काळात लाॅकडाऊन व निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महिलापोलिसांनाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. चेकपोस्ट, नाकाबंदी तसेच गस्तीसाठी कर्तव्य बजवावे लागत आहे. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत या ‘वुमेन वॉरियर्स’ला ड्युटी करावी लागत आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, लेकरांना जवळ घेता येत नाही, त्यामुळे हे संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा या महिलापोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेण्यात येत आहे. त्यात तुलनेने कमी संख्या असूनही महिला पोलिसांना बारा तासांपेक्षा जास्त काम  करावे लागत आहे. परिणामी त्यांची मुले, कुटुंबातील इतर सदस्य तसेच नातेवाईकांनाही वेळ देणे सहज शक्य होत नाही. तसेच छोट्या कुटुंबातील त्यांची मोठी कसरत होत आहे. मुलांना सांभाळायला कोणी नसल्याने त्यांची घालमेल सुरू असते. त्यामुळे काहींनी मुलांना गावाकडे तसेच आजोळी पाठवले आहे. मात्र तरी देखील मुलांची काळजी लागून असते. तसेच घरच्यांकडून या महिला पोलिसांची सातत्याने चौकशी केली जाते. 

कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच

शहर पोलीस दलातील महिला पोलिसांची मुले बाल्यावस्थेत तसेच विद्यार्थीदशेत आहेत. शहरातील काही महिला पोलिसांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयामध्ये ड्युटी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वत:ला विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी मुलांना भेटता येत नाही. त्यांना जवळ घेता येत नाही. तसेच नातेवाईकांकडे जाता येत नाही. अशावेळी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी मोबाईलवरूनच विचारपूस केली जाते. प्रत्यक्षात भेट होत नसल्याने व्हिडीओ कॉल करून भेट झाल्याचे समाधान त्यांना मानावे लागते.

पोलीस शिपाई उज्वला पाटील म्हणाल्या,  अनुकंपा तत्वावर मी पोलीस दलात दाखल झाले. मुली घरी एकट्याच असतात. फोनवरूनच त्यांना समजूत घालावी लागते. महिलांशी संबंधित प्रकरणे असल्यास त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो. अशावेळी मुलींचा फोन घेता येत नाही. नाकांबंदी, बंदोबस्त असल्यास रात्री उशिरापर्यंत ड्यूटी करावी लागते.

"ड्यूटी करून रात्री उशिरा घरी गेल्यानंतर अंघोळ करावी लागते. त्यानंतर जेवण करून मुलांना किमान अर्धातास द्यावा लागतो. रात्री दहानंतर मुलींचा फोन किंवा व्हिडीओ काॅल येतो. मम्मी केव्हा येणार तू, अशी विचारणा करतात. नातेवाईकही मोबाइलवरून काळजी घ्या, असे आस्थेवाईकपणे सांगतात. असे सांगवीच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी सांगितले आहे".  

महिलांशी संबंधित प्रकरणे संवेदनशील असतात. त्याचे कामकाज ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यात मोठा वेळ जातो. यात रात्री उशिर होतो. अशावेळी सासू व मुलीचा फोन येतो. नातेवाइकांचीही मोबाइलवरून चौकशी करावी लागते. ते सर्व जण समजून घेतात. महिला पोलिसांनाही ‘ड्यूटी’ महत्त्वाचीच आहे. 

                                                                                     नीता उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, चिंचवड

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसWomenमहिला