शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

महिला पोलिसांच्या कार्याला सलाम! लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत बजावतात कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 17:45 IST

कोरोना संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा

ठळक मुद्देपिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता असल्याने महिला पोलिसांनाही बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे.

नारायण बडगुजर 

पिंपरी: कोरोना काळात लाॅकडाऊन व निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महिलापोलिसांनाही रस्त्यावर उतरावे लागले आहे. चेकपोस्ट, नाकाबंदी तसेच गस्तीसाठी कर्तव्य बजवावे लागत आहे. लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत या ‘वुमेन वॉरियर्स’ला ड्युटी करावी लागत आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही, लेकरांना जवळ घेता येत नाही, त्यामुळे हे संकट लवकर दूर होऊ दे, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे, अशी अपेक्षा या महिलापोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालय नवे असल्याने मनुष्यबळाची कमतरता आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून घेण्यात येत आहे. त्यात तुलनेने कमी संख्या असूनही महिला पोलिसांना बारा तासांपेक्षा जास्त काम  करावे लागत आहे. परिणामी त्यांची मुले, कुटुंबातील इतर सदस्य तसेच नातेवाईकांनाही वेळ देणे सहज शक्य होत नाही. तसेच छोट्या कुटुंबातील त्यांची मोठी कसरत होत आहे. मुलांना सांभाळायला कोणी नसल्याने त्यांची घालमेल सुरू असते. त्यामुळे काहींनी मुलांना गावाकडे तसेच आजोळी पाठवले आहे. मात्र तरी देखील मुलांची काळजी लागून असते. तसेच घरच्यांकडून या महिला पोलिसांची सातत्याने चौकशी केली जाते. 

कुटुंबाची काळजी मोबाईलवरूनच

शहर पोलीस दलातील महिला पोलिसांची मुले बाल्यावस्थेत तसेच विद्यार्थीदशेत आहेत. शहरातील काही महिला पोलिसांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयामध्ये ड्युटी करावी लागते. त्यामुळे त्यांना स्वत:ला विलगीकरणात रहावे लागते. अशावेळी मुलांना भेटता येत नाही. त्यांना जवळ घेता येत नाही. तसेच नातेवाईकांकडे जाता येत नाही. अशावेळी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी मोबाईलवरूनच विचारपूस केली जाते. प्रत्यक्षात भेट होत नसल्याने व्हिडीओ कॉल करून भेट झाल्याचे समाधान त्यांना मानावे लागते.

पोलीस शिपाई उज्वला पाटील म्हणाल्या,  अनुकंपा तत्वावर मी पोलीस दलात दाखल झाले. मुली घरी एकट्याच असतात. फोनवरूनच त्यांना समजूत घालावी लागते. महिलांशी संबंधित प्रकरणे असल्यास त्यासाठी पूर्ण वेळ द्यावाच लागतो. अशावेळी मुलींचा फोन घेता येत नाही. नाकांबंदी, बंदोबस्त असल्यास रात्री उशिरापर्यंत ड्यूटी करावी लागते.

"ड्यूटी करून रात्री उशिरा घरी गेल्यानंतर अंघोळ करावी लागते. त्यानंतर जेवण करून मुलांना किमान अर्धातास द्यावा लागतो. रात्री दहानंतर मुलींचा फोन किंवा व्हिडीओ काॅल येतो. मम्मी केव्हा येणार तू, अशी विचारणा करतात. नातेवाईकही मोबाइलवरून काळजी घ्या, असे आस्थेवाईकपणे सांगतात. असे सांगवीच्या पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी सांगितले आहे".  

महिलांशी संबंधित प्रकरणे संवेदनशील असतात. त्याचे कामकाज ठराविक वेळेत पूर्ण करावे लागते. त्यात मोठा वेळ जातो. यात रात्री उशिर होतो. अशावेळी सासू व मुलीचा फोन येतो. नातेवाइकांचीही मोबाइलवरून चौकशी करावी लागते. ते सर्व जण समजून घेतात. महिला पोलिसांनाही ‘ड्यूटी’ महत्त्वाचीच आहे. 

                                                                                     नीता उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, चिंचवड

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसWomenमहिला