शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांचा रिमोट कंट्रोल पुणे, मुंबई अन् बारामतीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:01 IST

पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास झाला....

- विश्वास मोरे

पिंपरी : जागतिक नकाशावर औद्योगिकनगरी म्हणून लौकिक मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा भौतिक विकास झपाट्याने झाला; पण शहरासाठी स्थानिक एकमुखी आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वांचा अभाव आहे. क्षमता असतानाही शहराचा सर्वांगीण विकास झालेला नाही. सुवर्णमहोत्सव पूर्ण केलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची महापालिका मंगळवारी (दि. ११) चाळिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. तरीही पुणे, बारामती आणि मुंबईवरून नियंत्रित केला जाणारा रिमोट कंट्रोल जाऊन स्थानिक नेतृत्व सक्षम कधी होणार? द्वेषविरहित राजकारण आणि गावकी भावकीतून स्थानिक नेते बाहेर पडून एकात्मिक विकासाचे स्वप्न साकार करणार का? आतातरी स्थानिक नेत्यांचा स्वाभिमान जागा होणार की नाही? असा सवाल सुजाण नागरिक उपस्थित करीत आहेत.

पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजुला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास झाला. स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांच्या संकल्पनेतून या शहराची निर्मिती झाली. ११ ऑक्टोबर १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. पहिले महापौर होण्याचा मान ज्ञानेश्वर लांडगे यांना मिळाला. त्यानंतर गाव ते महानगर आणि महानगर ते मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल सुरू आहे. गेल्या ५० वर्षांत येथील राजकारणावर पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील नेत्यांचा वरचष्मा राहिला आहे. स्थानिक पातळीवर महामंडळाचे राज्य मंत्रिपद, आमदार, खासदार, महापौर, स्थायी समिती सभापती, पक्षनेता अशी विविध पदे शहरातील नेतृत्वास मिळाली. तरी सत्तासूत्रे बारामती आणि पुणे, मुंबईतील नेत्यांच्या हाती राहिली आहेत.

बाहेरील नेत्यांचा वरचष्मा

माजी मुख्यमंत्री शरद पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, अजित पवार यांनी शहराचे नेतृत्व केले. मोरे यांच्या निधनानंतर सुरेश कलमाडी आणि हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांनी काहीकाळ शहराचा कारभार पाहिला. २०१७ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिकांचे नेतृत्व असले तरी त्यांचा रिमोट एक, तर बारामती आणि अलीकडच्या काळात मुंबईत राहिला आहे. त्यामुळेही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाहेरच्या नेतृत्वावर अवलंबून रहावे लागत आहे.

नेतृत्वास सक्षम होऊ दिले नाही

माजी आमदार सोपानराव फुगे, मोतीराम पवार, अशोक तापकीर, ज्ञानेश्वर लांडगे, माजी खासदार गजानन बाबर, माजी आमदार विलास लांडे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व अण्णा बनसोडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर आझम पानसरे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे मंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे व लोकलेखा समितीचे ॲड. सचिन पटवर्धन या विविध स्थानिक नेत्यांनी पदे भूषविली. मात्र, कोण्या एका व्यक्तीस शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळू दिलेली नाही. स्थानिक पातळीवरील नेते भांडत ठेवून रिमोट कंट्रोलचे राजकारण बाहेरून केले जात आहे.

राज्यपातळीवर मिळाली नाही संधी...

नाना शितोळे, तात्या कदम, अशोक कदम, भाई सोनावणे, अंकुशराव लांडगे, मंगला कदम, योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, सुलभा उबाळे, सीमा सावळे, संजोग वाघेरे, मानव कांबळे, मारुती भापकर, चंद्रकांता सोनकांबळे, बाबा धुमाळ, एकनाथ पवार, राहुल कलाटे, प्रशांत शितोळे, विलास मडिगेरी, नाना काटे, सचिन साठे या स्थानिक नेत्यांमध्ये क्षमता असूनही राज्य पातळीवर काम करण्याची त्यांना संधी मिळू शकली नाही. तसेच गेल्या पंधरा वर्षांत स्थानिक नेते भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या विधानसभा आणि काहीजण माझा वॉर्ड व माझी विधानसभा यात घुटमळत आहेत. मात्र, शहर पातळीवरील विकासाची दृष्टी स्थानिक नेत्यांमध्ये दिसून येत नाही, हे वास्तव आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरीAjit Pawarअजित पवारMumbaiमुंबईSharad Pawarशरद पवारBaramatiबारामती