शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:39 IST

उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे

पिंपरी : राज ठाकरे यांचे राजकारण संपल आहे. त्यामुळे सध्या ते वैतागले आहेत. उत्तर प्रदेश ही राम आणि कृष्णाची भूमी आहे. येथून गंगा नदी वाहते. यामुळे हिदू बांधवांसाठी उत्तर प्रदेश पवीत्र भूमी आहे. याच उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं अशी प्रभू रामाचीच इच्छा नाही, असे मत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केले.

माझं काय होणार, या चिंतेने राज ठाकरे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते वेळोवेळी भूमिका बदलत आहेत. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने बोलत ते नाटके करत आहेत. आझमी म्हणाले, राज ठाकरे यांनी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे ते आज ही परिस्थिती भोगत आहेत. उत्तर भारतीय समाजाला त्यांनी त्रास दिला. त्यांचा अपमान केला. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याबद्दल द्वेष आहे. या द्वेषाला घाबरूनच त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. उत्तर भारतीय नागरिक आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी.

राज ठाकरे कधी म्हणतात की उत्तर प्रदेशात कोणताही विकास झालेला नाही. कधी म्हणतात की विकास पाहायचा असेल तर उत्तर प्रदेशात जायला हवे. कधी मोदींसोबत गुजरात दौरा करतात. तर, कधी त्यांच्यावर टीका करतात. वेळोवेळी भूमिका बदलून ते नाटक करत आहे. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे केल जातंय. देशाची परिस्थिती कठीण होत चालली आहे. कोणी भोंगे, कोणी मशिदी, कोणी मंदिरांबद्दल बोलत आहे. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सरकारकडून तर नवीन संविधान बनविण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली.

हिंदूत्ववादी आहे हे सांगण्यासाठी चढाओढ

सध्या हिंदूची मते मिळविण्यासाठी हिंदूत्व आहे हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. विशेषत: कॅबिनेट मध्ये बसून आम्हीच बाबरी मशिद पाडली हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मी कॅबिनेट मध्ये त्यांच्या बाजूला बसायला जाणार नाही. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAbu Azmiअबू आझमीSocialसामाजिकMuslimमुस्लीम