शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

"राजे ठाकरेंनी अयोध्येत यावं अशी रामाचीच इच्छा नाही", अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 16:39 IST

उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे

पिंपरी : राज ठाकरे यांचे राजकारण संपल आहे. त्यामुळे सध्या ते वैतागले आहेत. उत्तर प्रदेश ही राम आणि कृष्णाची भूमी आहे. येथून गंगा नदी वाहते. यामुळे हिदू बांधवांसाठी उत्तर प्रदेश पवीत्र भूमी आहे. याच उत्तर प्रदेशातील नागरिकांवर हल्ले करून त्यांना मारहाण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं अशी प्रभू रामाचीच इच्छा नाही, असे मत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केले.

माझं काय होणार, या चिंतेने राज ठाकरे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते वेळोवेळी भूमिका बदलत आहेत. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने बोलत ते नाटके करत आहेत. आझमी म्हणाले, राज ठाकरे यांनी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे ते आज ही परिस्थिती भोगत आहेत. उत्तर भारतीय समाजाला त्यांनी त्रास दिला. त्यांचा अपमान केला. त्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याबद्दल द्वेष आहे. या द्वेषाला घाबरूनच त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. उत्तर भारतीय नागरिक आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी.

राज ठाकरे कधी म्हणतात की उत्तर प्रदेशात कोणताही विकास झालेला नाही. कधी म्हणतात की विकास पाहायचा असेल तर उत्तर प्रदेशात जायला हवे. कधी मोदींसोबत गुजरात दौरा करतात. तर, कधी त्यांच्यावर टीका करतात. वेळोवेळी भूमिका बदलून ते नाटक करत आहे. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे केल जातंय. देशाची परिस्थिती कठीण होत चालली आहे. कोणी भोंगे, कोणी मशिदी, कोणी मंदिरांबद्दल बोलत आहे. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सरकारकडून तर नवीन संविधान बनविण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केली.

हिंदूत्ववादी आहे हे सांगण्यासाठी चढाओढ

सध्या हिंदूची मते मिळविण्यासाठी हिंदूत्व आहे हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. विशेषत: कॅबिनेट मध्ये बसून आम्हीच बाबरी मशिद पाडली हे सांगण्यासाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे मी कॅबिनेट मध्ये त्यांच्या बाजूला बसायला जाणार नाही. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAbu Azmiअबू आझमीSocialसामाजिकMuslimमुस्लीम