शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समस्यांवर होतेय फक्त चर्चा, तोडगा मात्र काढलाच जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 03:25 IST

विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे जास्त ओझे विद्यार्थी वाहून नेत आहेत. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे.

चिंचवड : विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे जास्त ओझे विद्यार्थी वाहून नेत आहेत. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. याबाबत अनेकदा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला आहे. दप्तराच्या वजनाबाबत वारंवार चर्चा होते. मात्र समस्यांवर तोडगा निघत नसल्याने अथवा शाळा प्रशासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी दप्तराच्या अधिक ओझामुळे त्रस्त झाले असल्याचे वास्तव आहे.‘लोकमत’ पाहणीत चिंचवडमधील काही इंग्रजी शाळेत आढावा घेतला असता, बहुतांशी विद्यार्थी दप्तराच्या ओझ्यामुळे झुकल्याचे दिसून आले. दप्तरात वह्या, पुस्तके, कंपासपेटी, चित्रकलेचे साहित्य, पाणी बाटली व डब्याचे ओझे घेऊन विद्यार्थी शाळेत येत आहेत. आठवड्यातून एकदा स्केटिंग अथवा कराटे या खेळाचे साहित्यही विद्यार्थी घेऊन येत असल्याचे पालक सांगत आहेत. याबाबत पालक व शाळा प्रशासनास गांभीर्य नसल्याने विद्यार्थी दप्तराच्या ओझामुळे त्रस्त आहेत.चिंचवडमधील काकडे पार्कमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन साडेचार ते पाच किलो असल्याचे समोर आले. या विद्यार्थ्यांचे वजन बत्तीस किलो ते पस्तीस किलो होते. सरासरी विद्यार्थी दररोज साडेचार ते सहा किलो वजनाचे ओझे पाठीवर घेऊन शाळेत येत आहेत.विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची पाहणी होत नाही.मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर दप्तराच्या वाजनाबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा, असे धोरण आहे. दप्तराच्या ओझ्याबाबत संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्याचे व पाठदुखीचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्याचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती़ परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे पेलवत नाही. त्यामुळे पालकांनाच दप्तर घ्यावे लागत आहे. परंतु वर्गापर्यंत जाण्यासाठीही विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण