शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिंपरीकरांना पाऊस झेलतच करावा लागणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 14:37 IST

काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना गळक्या बसचा अनुभव येत आहे...

ठळक मुद्देपीएमपीच्या बस गळक्या प्रशासन म्हणते ७० टक्के बस पावसासाठी सज्ज 

पुणे : गळके छत, फुटलेल्या काचा यांमुळे  प्रवाशांना अनेक बसमधून भिजतच प्रवास करावा लागत आहे. अनेक बसथांब्यांचीही दुरवस्था झाल्याने पावसात उभे राहणेही कठीण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. दरम्यान, पीएमपीच्या मालकीच्या जवळपास ७० टक्के बस पावसासाठी सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पूर्वमोसमी पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आहे. लवकरच मॉन्सूनच्या सरी कोसळण्यास सुरूवात होईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पीएमपी प्रशासनाकडून बसेसच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले जाते. मागील महिनाभरापासून हे काम हाती घेण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात मालकीच्या सुमारे १३७५ व भाडेतत्त्वावरील ५७५ बस आहेत. मालकीच्या ४३० हून अधिक बस ११ वर्षांपुढील असून त्यापैकी बहुतेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. काही बसच्या छताचा पत्रा उचकटलेला आहे, तर काही बसच्या खिडक्यांच्या काचा गायब आहेत. काही बसच्या चालकाच्या समोरील काचाही फुटलेल्या आहेत. या बस खूप जुन्या असल्याने त्याचे सुटे भाग उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दुरूस्ती करताना अडथळे येतात. तात्पुरती मलमपट्टी करून त्यावरच काम भागवावे लागते. काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना गळक्या बसचा अनुभव येत आहे. काही बसच्या दोन्ही बाजूच्या खिडकीच्या काचा निघालेल्या आहेत. तर काही बसच्या छताचे पत्रे तुटलेले आहेत. काही बसला हवेसाठी छताला मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्याचे झाकणही तुटलेले आहे. या छतातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर बसमधे येऊ शकते. बसच्या खिडकीच्या काचाही नीट लागत नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत. दोन्ही बाजूला दरवाजे असलेल्या बसपैकी काही बसचे उजव्या बाजूचे दरवाजे तुटलेले आहेत. त्यामुळे त्यातूनही पावसाचे पाणी आत येऊ शकते.  

.पावसाळा सुरू होणार असल्याने मागील महिनाभरापासून बस दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत ७० टक्के बस दुरूस्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खिडक्या दुरूस्ती, गळके छत, काचा, वायपर व इतर गोष्टींचा समावेश आहे.   काही वेळा कामे करूनही पावसातच प्रत्यक्ष छत कुठे गळत आहे, हे समजते, असा दावा पीएमपीतील अधिकाºयांकडून केला जात आहे.    ..............पुणे व पिंपरी चिंचवडसह लगतच्या परिसरात जवळपास साडेतीन हजारांहून अधिक बसथांबे आहेत. त्यापैकी सुमारे दीड हजार थांब्यांना शेड नाही. तर काही शेडच्या छताची दुरावस्था झाली आहे. थांब्याची दुरूस्तीची जबाबदारी या थांब्यावर जाहिरात लावणाºया जाहिरातदाराची आहे. तर जिथे जाहिराती नाहीत त्या थांब्यांची देखभाल पीएमपीचा स्थापत्य विभाग करतो. पण दोन्हींकडूनही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. प्रवासी आशा शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी सुतारवाडी येथील एका बसथांब्याचे छत दुरूस्त करण्यासाठी तक्रार दिली होती. पण आजपर्यंत हा थांबा दुरूस्त न केल्याचे त्यांनी सांगितले.   ..............        

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीRainपाऊस