शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनाच्या 'व्हायरस'ने हिंजवडी आयटीनगरी 'हायजॅक'

By विश्वास मोरे | Updated: July 29, 2025 10:38 IST

जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे.

- डॉ. विश्वास मोरे

पिंपरी : जागतिक नकाशावर आयटी हब म्हणून लौकिक हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे झालेले दुर्लक्ष, ढिम्म प्रशासनामुळे उद्योग स्थलांतराची वेळ आली आहे. वाहतूक प्रश्नांबरोबरच, दळण-वळण, रस्ते, पाणी, आरोग्य, वैद्यकीय अशा अपुऱ्या मूलभूत सुविधांना नागरिक आणि कामगार कंपन्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तयार केलेला कृती आराखडा सत्यात साकारणे गरजेचे आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीची अर्थात आयटी पार्कची स्थापना १९९९ मध्ये झाली. त्यावेळी पाच टप्प्यात याभागांचा विकास करण्याचे नियोजन केले होते. टप्पा एक, दोन आणि तीनमध्ये विकास झाला आहे. याठिकाणी हिंजवडी, माण, मारुंजी अशा विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एलॲडटी, बिर्ला सॉफ्टवेअर, इन्फोटेक कार्पोरेट, थिंक स्मार्ट, ई झेस्ट, आयबीएम, फॉक्स वेगन आयटी पार्क, टेलस्ट्रा यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांनी एकापाठोपाठ प्रकल्प सुरू केले. मात्र, आयटीनगरी आल्याने भूमिहीन होण्याची भावना झाल्याने टप्पा चार आणि पाचला स्थानिकांनी विरोध झाल्याने विस्तार थांबला आहे. सध्या आजमितीस तिथे चार ते साडेचार लाख संगणक अभियंते आणि कामगारांना रोजगार मिळाला आहे. मात्र, मुलभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या त्रस्त आहेत.

दोन बैठका झाल्या, केवळ टोलवाटोलवी

हिंजवडी नागरी समस्यांवरून प्रशासकीय पातळीवर केवळ बैठकांचा सिलसिला सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला आले की अधिकारी कान देऊन ऐकतात. माना डोलवितात. प्रत्यक्षात येरे माझ्या मागल्या सुरू आहे. पीएमआरडीए एमआयडीसीकडे, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन हे एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत.

आयटी पार्कच्या उभारणीत नेते शरद पवार, माजी खासदार नाना नवले यांचे योगदान मोलाचे आहे. पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. मात्र, सत्ता असतानाही १५ वर्ष येथील प्रश्नांकडे लक्ष दिले गेले नाही. आता महायुतीच्या काळात दोन बैठका झाल्या, जुजबी प्रश्न सोडविण्यापलीकडे काही होत नसल्याचे वास्तव आहे. टोलवाटोलवी सुरू आहे.

कशामुळे होतेय आयटी कंपन्यांचे स्थलांतर ?

आशिया खंडातील एकमेव आयटीनगरी अशी ओळख यातून तयार झाली. मात्र, येथील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे, प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आजवर तब्बल ३७ कंपन्यांनी बंगळुरू आणि इतर ठिकाणी स्थलांतर केले आहे.

उद्योजकांच्या अपेक्षाहिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने २० मुद्द्यांसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. त्यापैकी काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्रलंबित आहेत. वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्यासाठी वाहतूक नियोजनासाठी अधिक मनुष्यबळ, मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करून सेवा सुरू करावी. हिंजवडी येथील शिवाजी चौक ते स्मशानभूमीपर्यंतच्या ९०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण, बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग आवश्यकता, हिंजवडीत येणारे एमआयडीसी बाहेरील रस्ते रुंदीकरण करावे, पदपथ निर्माण करावेत. नांदेपर्यंत रस्त्याचे काम, बाणेर भुयारी मार्ग, राधा चौक ते शेडगेवस्तीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण.

पिंपरी चिंचवडमधून येथे मोठ्या प्रमाणावर अभियंते येतात. शहरातील वाकड, पिंपळे सौदागर नाशिक फाटा जाण्यासाठी मेट्रो मार्ग. गावठाणांमध्ये निर्माण होणारा कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे. मूलभूत सुविधांचे सक्षमीकरण करणे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेTrafficवाहतूक कोंडीhinjawadiहिंजवडी