पिंपरी : ज्ञानेश्वर माऊली ७५० वा रथोत्सव व केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसाला धक्काबुक्की व धमकी दिली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी सातच्या सुमारास आळंदी येथे घडली.
पोलिस अंमलदार संदीप रामचंद्र जगदाळे (वय ४४) यांनी याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील तुकाराम देवकर (रा. बोपखेल) व रवींद्र उत्तम खांडवे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापूर्वी हिंजवडी, माण येथेही पोलिसांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी गुन्हे दाखल केले होते.
फिर्यादीच्या हाताला लागला मारनियमाचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकारकडून वॉर्डन आणि वाहतूक पोलिसांना दमदाटी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. तसेच अल्पवयीन चालकांच्या पालकावर गुन्हे दाखल करावेत, पोलिसांनी वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे. अनेक कंटनेरचालकही नियमांचे उल्लघंन करतात. भरधाव वेगाने वाहने चालवितात. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.