शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:06 IST

शालेय क्रीडा स्पर्धेत अनिवार्य प्रमाणपत्रांवरून वाद | राज्यात अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर; खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली नाराजी | एका खेळाडूचे प्रमाणपत्र नसेल तरी सर्व संघ बाद केल्याचा प्रकार उघड | राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयाने केली तयार नवीन नियमावली

आकाश झगडे

पिंपरी : 'बोगस खेळाडू खेळवण्याच्या प्रकारांमध्ये वाढ' होत असल्याचे कारण देत क्रीडा व युवक संचालनालयाने खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी नवीन आणि क्लिष्ट अटी, शर्ती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे खेळाडू, क्रीडा शिक्षक नाराज आहेत. या अटींमुळे गुणवंत खेळाडू स्पर्धापासून वंचित राहत असल्याचे क्रीडातज्ज्ञाचे मत आहे. खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि त्यांच्या पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शाळांकडून होत आहे.

राज्यात शालेय क्रीडा स्पर्धा अनेक ठिकाणी उत्साहात होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही स्पर्धा चांगल्या पद्धतीने होत आहेत. राज्यात काही ठिकाणी बोगस खेळाडू खेळवण्याचे प्रकार घडल्यामुळे क्रीडा व युतक संचालनालयाने खेळाडूंच्या वयनिश्चितीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचा अनेक खेळाडूंना त्रास होत आहे. त्यांना खेळापासून वंचित रहावे लागत आहे.

प्रश्न सोडविण्याची मागणी

शाळा आणि पालकांनी या अटी शिथिल करून खेळाडूंना दिलासा देण्याची मागणी केली आहे. बोगस प्रमाणपत्रे सादर करून खेळवणाऱ्या शाळांसाठी कठोर शिक्षा करावी. सांघिक खेळामध्ये खेळाडू सहभागी होत असतात. यात एक, दोन खेळाडूंसाठी इतर खेळाडूंवर अन्याय का?, तीन प्रमाणपत्रे अनिवार्य करण्याची काय गरज, एकच भक्कम पुरावा अनिवार्य करून ग्राह्य धरावा.

संचालनालयाकडून चाचणी अनिवार्य

२०२५-२६ पासून भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी वयनिश्चिती चाचणी अनिवार्य केली आहे. काही प्रकरणांत हमीपत्र सादर करून शिथिलता देण्यात येते.शाळांचे आक्षेप कशाला?

जुने दाखले मिळवणे कठीण : खेळाडूच्या जन्माच्या ५ वर्षांपर्यंतचा सरकारी जन्मदाखला आणि त्याने पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमधील नोंदणीचा उतारा (निर्गम उतारा) सादर करणे अनिवार्य केले आहे. आंतरराज्यातून स्थलांतरित झालेल्या, आरटीईअंतर्गत थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळवलेल्या, अनेक शाळा बदललेल्या खेळाडूंसाठी हे जुने दाखले मिळवणे अत्यंत अवघड आहे. यात वेळ, खर्च आणि मोठा त्रास सहन करावा लागत आहे.माध्यमिक शाळांच्या नॉर्दीकडे दुर्लक्ष : संचालनालय केवळ पहिल्या इयत्तेतील नॉर्दीनाच मान्यता देत आहे, तर सध्याच्या किंवा माध्यमिक शाळांमधील नोंदींकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्याच्या शाळेच्या अधिकृत रेकॉर्डवरच अविश्वास दाखवला जात असल्याची त्यांची तक्रार आहे.

संवादाचा अभाव : एक ऑगस्ट शासन निर्णय आल्यावर लगेच काही स्पर्धा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना कागदपत्रे मिळवण्यासाठी वेळ मिळाला नाही. क्रीडा विभागाने या नवीन नियमांची माहिती शाळांना वेळेत दिली नाही, असा आरोप शाळांनी केला आहे. अनेक शाळांना स्पर्धास्थळी पोहोचल्यावरच या अटींबद्दल समजले. यामुळे खेळाडू आणि शाळांची धांदल उडाली. यानंतरही वरच्या स्तरावर खेळाडूंच्या वयाची खात्री करण्यासाठी 'एज व्हेरिफिकेशन टेस्ट' अनिवार्य करण्यात आली आहे. या चाचणीसाठीचा भुर्दंड खेळाडूंवर असणार आहे. तसेच अनेक भटक्या व विमुक्त समाजातून किवा भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत. चुकीचे वय लागले ते शासन नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे.

बोगस खेळाडू खेळवणाऱ्या शाळा व क्रीडा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मात्र, अशा क्लिष्ट अर्टीमधून शिथिलता मिळावी. कोणताही एक भक्कम पुरावा ग्राह्य धरावा. -  शरदचंद्र धारूरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ  राज्यातील विविध भागांतून निवेदन येत आहेत. या विषयावर येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र, बोगस खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत खेळू दिले जाणार नाही, हे निश्चित. - सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य अनेक खेळाडू बनावट कागदपत्रे वापरून वयाची हेराफेरी करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या अटींची योग्य अंमलबजावणी व्हावी, हा उद्देश आहे. सांघिक खेळात एक-दोन खेळाडूंमुळे संघ बाद केल्याच्या प्रकाराबाबत माहिती घ्यावी लागेल. -  जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी वरिष्ठांकडून प्राप्त आदेशाची अंमलबजावणी आम्ही करत आहोत. - सुरेश काकड, तालुका क्रीडा, अधिकारी

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड