शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कामशेतमध्ये सततच्या वाहतूककोंडीमुळे पादचारी, चालकांना करावी लागते कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:29 IST

कामशेत येथील मुख्य रस्त्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. डांबरीकरण झाल्यानंतर काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे.

- चंद्रकांत लोळेकामशेत - येथील मुख्य रस्त्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. डांबरीकरण झाल्यानंतर काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे. रस्त्याची एक बाजू बंद, तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक एका बाजूने सुरू असल्याने येथे वाहतूककोंडीची डोकेदुखी वाढली आहे. कोंडी सोडवणे वाहतूक पोलिसांनाही शक्य होत नसल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी वाहनचालकांना येथे दररोज कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने कामशेत शहरातील मुख्य रस्ता, वडगाव, लोणावळा शहरातील वलवण आदी तीन ठिकाणच्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरूकेले. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. कामशेतमधील मुख्य रस्त्याचे काम जानेवारीत सुरूझाले. कामशेत पोलीस ठाणे ते खामशेत फाटा आणि छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते पवनानगर फाटा असे कामाचे स्वरूप होते. या कामात प्रथम मुख्य रस्त्यावर बीएम, कार्पेट व सीलकोट याप्रमाणे डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मुख्य रस्त्याच्या ज्या भागात पाणी निचरा समस्या आणि त्यामुळे वारंवार रस्त्याची दुरवस्था होते त्या ठिकाणी काँक्रीटीकरण करण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते पवनानगर फाटा या पूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. सध्या छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते गणपती चौक येथील काँक्रीटीकरण सुरू आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे.अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीची समस्याकामशेत शहर हे मध्यवर्ती असल्याने सुमारे ७० गावांमधील ग्रामस्थांचा येथे राबता असतो. खरेदी व तत्सम कारणांसाठी येणाऱ्या ग्रामस्थांसह दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक वाहने आदींची येथे मोठी गर्दी असते. गेल्या काही वर्षांमध्ये मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणांमुळे येथे वाहतूककोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात रस्त्याचे काम सुरू असल्याने आणखी भर पडल्याने वाहनचालक व पादचारी यांची डोकेदुखी वाढली आहे.वाहतूक नियमनासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची गरजअवजड वाहन अथवा चारचाकी वाहन या मार्गावरून जात असताना समोरून दुचाकी अथवा पादचारीही रस्ता ओलांडू शकत नाही. एका बाजूकडील वाहने पूर्णमागे घेऊन वाहतूक खुली करण्यावाचून पर्याय राहत नाही. त्यात व्यापाºयांचे अवजड वाहन या रस्त्याने आलेच, तर ते मागे घेणेही जिकिरीचे होत आहे. परिणामी वाहनांची मोठी रांग लागत आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करावा, वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ वाढवावे आदी मागण्या नागरिक करीत आहेत.साईडपट्ट्यांचे काम अपूर्ण असल्याने धोकारस्त्याचे डांबरीकरण झाले, मात्र साइडपट्ट्या अद्याप भरल्या गेल्या नाही. साइडपट्ट्या त्या आधी भरणे महत्त्वाचे असताना तसे न झाल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. मुख्य रस्त्याला साइडपट्ट्यांचा आधार नसल्याने या रस्त्याच्या खाली उतरणाºया व वर चढणाºया अवजड वाहनांनी रस्त्याच्या कडेच्या बाजूकडील कार्पेटची दुरवस्था झाली. अवजड वाहने जाऊन व कडक उन्हामुळे अनेक ठिकाणी कार्पेट खचले आहे. तसेच रस्त्यावर कडेला लागलेल्या अनेक दुचाकी पडल्याने नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे काँक्र ीटीकरण झालेल्या भागातही अद्याप साइडपट्ट्या भरल्या गेल्या नसल्याने रस्त्याची उंची वाढल्याने दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्याखाली उतरवता येत नाहीत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड