शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

PCMC: १० दिवसांत किती अतिक्रमणे काढली रे भाऊ? अनधिकृत शेड, टपऱ्यांवरील कारवाईची घोषणा हवेतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 13:37 IST

दहा दिवस केलेल्या कारवाईचा दावा प्रत्यक्षात फार्सच असल्याचे स्पष्ट झाले....

पिंपरी : शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्याची घोषणा महापालिका आयुक्तांनी केली होती. त्यानुसार ५ ते १५ सप्टेंबरदरम्यान अतिक्रमणे काढण्यात येणार होेती. मात्र, या कारवाईची अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे प्रत्यक्षात नोंदच नसल्याचे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे दहा दिवस केलेल्या कारवाईचा दावा प्रत्यक्षात फार्सच असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील बहुतांश रस्ते, पदपथांवर सकाळी, सायंकाळी तात्पुरत्या हातगाड्या, टपऱ्या थाटून खाद्यपदार्थ, चहा विक्रेते व्यवसाय करतात. उपनगरांतील सर्वच ठिकाणचे रस्ते, पदपथांवर खाद्यपदार्थ, भाजीपाला आणि अन्य साहित्याची विक्री करणाऱ्या पथारी व्यावसायिकांनी बस्तान बसवल्याचे दिसून येते. त्यांना आवर घालण्यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, दहा दिवसात किती अतिक्रमणे काढली याची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अतिक्रमणांवर कारवाईची घोषणा पोकळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

घोषणा हवेतच...

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पदभार घेऊन वर्ष होऊन गेले. मात्र, त्यांनी एकदाही अतिक्रमणांवर कारवाई केली नव्हती. अखेर दहा दिवस धडक कारवाई राबविण्याची घोषणा त्यांनी केली होती. दहा दिवसांत कोणत्या परिसरात कारवाई करण्यात येणार आहे, याचे वेळापत्रकही ठरवले होते. मात्र, काही ठिकाणी किरकोळ कारवाई झाली. त्यानंतर मोहीम थंडावली.

राजकारण्यांचा वरदहस्त, आयुक्तांचे दुर्लक्ष

महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते पुन्हा एकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने ही अतिक्रमणे वारंवार उभी राहत आहेत. याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाच्या वतीने अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करणार असा दावा दरवेळी केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी