शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पवना धरण ९७.१७ टक्के भरले; १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 10:02 IST

गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३ मिमी पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देपवना जल विद्युत केंद्रातून १२०० क्युसेसने पवनानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु..

पवनानगर : पवनमावळ परिसरात संततधार सुरुच असल्याने आज (शनिवार, दि. ३) सकाळी सहापासून पवना धरणाच्या जल विद्युत केंद्रातून १२०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग पवनानदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार धरणसाठ्यात घसघशीत वाढ होऊन धरणात ९७.१७ जलसाठा आहे.  गेल्या चोवीस तासात ११५ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जून ते आज अखेर एकुण २१३३  पाऊस झाला आहे. यामुळे नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती पवनाधरण शाखा अभियंता ए. एम. गदवाल यांनी सांगितले आहे.पवनाधरणातून शनिवारी १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार

पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने शनिवारी  सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरण परिसरातून पाणी पुरवठा होतो. पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. जलाशयात होणारी वाढ आणि धरण परिसरातही पाऊस यामुळे धरणातून विसर्ग सोडावे लागणार आहे. शनिवारी सकाळी पवनाधरणातून १२०० क्यूसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येणार आहे. महापालिका आपत्कालीन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPavna Nagarपवना नगरriverनदीWaterपाणी