शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:37 IST

पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.

ठळक मुद्देपवना धरणात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४० टक्के साठा होता़ यावर्षी ३३ टक्के साठा शिल्लक

वडगाव मावळ : कडक उन्हामुळे मावळमधील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे़. पवना धरणात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४० टक्के साठा होता़ यावर्षी ३३ टक्के साठा शिल्लक आहे. पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी, ही शेती उद्योगाला पाणीपुरवठा करणारी व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. पिपरी-चिंचवड शहरासाठी धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. १५ मार्चपासून ४७० दशलक्ष लिटर एवढेच पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण हे सर्वांत मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील पन्नास ते साठ ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.पवना धरणाचे शाखा अभियंता ए़ एम़ गदवाल म्हणाले, ‘‘सध्याच्या कडक उन्हामुळे दिवसेंदिवस पवना धरणात पाणीसाठा कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी व सध्या असलेला पाणीसाठा जुलैअखेर पुरविण्यासाठी धरणातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने ७ टक्के साठा कमी आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले, ‘‘नाणे मावळातील वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून आठवड्यातून दोन दिवस १२० ते १५० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. कुंडलिका नदीच्या माध्यमातून ते इंद्रायणीला सोडले जाते. सध्या धरणात ५२.६८ टक्के पाणीसाठा आहे, तर जाधववाडी धरणात ५४ टक्के पाणीसाठा आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली होती. ...........

आंद्रा धरणातून २२ संस्थांना पाणीपुरवठा४शाखा अभियंता ए. आर. हांडे म्हणाले,‘‘आंद्रा धरणातून तळेगाव नगर परिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो़ दोन तीन आठवड्यातून २०० ते ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. सध्या ६४.८० टक्के पाणीसाठा आहे़ जुलैअखेर पर्यंत पुरेल.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpavana nagarपवनानगरDamधरण