शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:37 IST

पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.

ठळक मुद्देपवना धरणात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४० टक्के साठा होता़ यावर्षी ३३ टक्के साठा शिल्लक

वडगाव मावळ : कडक उन्हामुळे मावळमधील धरणांच्या पाणी साठ्यात घट झाली आहे़. पवना धरणात गेल्यावर्षी एप्रिलमध्ये ४० टक्के साठा होता़ यावर्षी ३३ टक्के साठा शिल्लक आहे. पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.मावळ तालुक्यात पवना, आंद्रा, वडिवळे, कासारसाई, जाधववाडी, ही शेती उद्योगाला पाणीपुरवठा करणारी व नळपाणी पुरवठा योजनेंतर्गत पिण्याचे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. पिपरी-चिंचवड शहरासाठी धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. १५ मार्चपासून ४७० दशलक्ष लिटर एवढेच पाणी सोडण्यात येत आहे. पवना धरण हे सर्वांत मोठे असून, त्यातून पिंपरी-चिंचवड, देहूरोड, तळेगाव व मावळातील औद्योगिक वसाहती व तालुक्यातील पन्नास ते साठ ग्रामपंचायतीच्या पाणी योजना व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.पवना धरणाचे शाखा अभियंता ए़ एम़ गदवाल म्हणाले, ‘‘सध्याच्या कडक उन्हामुळे दिवसेंदिवस पवना धरणात पाणीसाठा कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी व सध्या असलेला पाणीसाठा जुलैअखेर पुरविण्यासाठी धरणातून रोज ४४० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेने ७ टक्के साठा कमी आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले, ‘‘नाणे मावळातील वडिवळे धरणातून वडगाव, इंदोरी, कामशेत, टाकवे आदी गावांसह सुमारे पंधरा ग्रामपंचायती, टाकवे औद्योगिक वसाहत, तसेच अकराशे हेक्टर शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणातून आठवड्यातून दोन दिवस १२० ते १५० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. कुंडलिका नदीच्या माध्यमातून ते इंद्रायणीला सोडले जाते. सध्या धरणात ५२.६८ टक्के पाणीसाठा आहे, तर जाधववाडी धरणात ५४ टक्के पाणीसाठा आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून पाचशे दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. यंदा पाणीसाठा कमी असल्याने ४४० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, अशी सूचना पाटबंधारे विभागाने केली होती. ...........

आंद्रा धरणातून २२ संस्थांना पाणीपुरवठा४शाखा अभियंता ए. आर. हांडे म्हणाले,‘‘आंद्रा धरणातून तळेगाव नगर परिषद, तळेगाव एमआयडीसी, आळंदी नगर परिषद यासह २२ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो़ दोन तीन आठवड्यातून २०० ते ५०० दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. सध्या ६४.८० टक्के पाणीसाठा आहे़ जुलैअखेर पर्यंत पुरेल.’’ 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpavana nagarपवनानगरDamधरण