शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पवना जलवाहिनीचा ३८८ वरून ९०० कोटींवर खर्च जाणार; आतापर्यंत दोनशे कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:43 IST

पाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचणार....

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनीच्या प्रकल्पाला राज्य सरकारने स्थगिती दिली असताना आतापर्यंत या जलवाहिनीवर तब्बल दोनशे कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हा प्रकल्प गेल्या बारा वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे हा खर्च आता ३८८ कोटींवरून ९०० कोटींवर जाणार आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू असताना २०११मध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. त्यानंतर या प्रकल्पाचा मुद्दा चिघळला आणि राज्य सरकारने प्रकल्पाला स्थगिती दिली. मात्र, आता या प्रकल्पावरील स्थगिती राज्य सरकारने उठविली आहे. हा प्रकल्प सुरुवातीला ३८७ कोटी ९२ लाख रुपयांमध्ये होणार होता. यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजने अंतर्गत ११६ कोटी ९२ लाख, तर राज्य सरकारकडून ४६ कोटी ७७ लाख रुपये महापालिकेला मिळाले होते, तर महापालिकेकडून २३४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार होता. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद आहे. सध्याच्या वाढलेल्या महागाईमुळे या प्रकल्पाचा खर्च सुमारे ९०० कोटींच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाण्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च वाचणार...

पवना नदी शेजारील गावांमधील दूषित पाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यावरून पाणी उचलून प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते शुद्ध केले जाते. केमिकल, वीज आदींसाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेला खर्च करावा लागत आहे. थेट जलवाहिनीने पाणी आणल्यास पाण्यावर अत्यंत सौम्य प्रकारची प्रक्रिया करावा लागणार आहे तसेच नदीतून पाणी घेण्यासाठी जलसंपदा विभागाला जास्त पैसे मोजावे लागत असून, त्या तुलनेत धरणातून पाणी उचलण्यासाठी कमी पैसे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

हे काम तेव्हा ३८८ कोटींमध्ये होणे अपेक्षित होते. या योजनेसाठी निगडी सेक्टर क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र ते पवना धरण अशी ३४.७१ किमी अंतराची जलवाहिनी टाकण्यात येणार होती. शहर हद्दीतील ६.४० किलोमीटर अंतरापैकी ४.४० किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम २०११ला झाले. शेतकरी आंदोलनामुळे हे काम ९ ऑगस्ट २०११ पासून बंद होते. त्यामुळे ९०० कोटींपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी