शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनो सावधान ! सहा महिन्यांत शहरातील तब्बल २४२ मुले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 11:25 IST

पोलीस तपासामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांत २४२ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यातील काही मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर काहीजण अद्याप बेपत्ताच आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तपासामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर येत आहेत.

पालकांची शिस्त, अभ्यासासाठी दबाव, घरात सतत होणारे वाद, बाह्य जगाचे आकर्षण, शिक्षणाची भीती, सोशल मीडिया आणि चित्रपटात रंगवलेले आभासी जग अशी प्रमुख कारणे मुलांच्या घर सोडण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे तपासांमध्ये दिसून आले आहे.

कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाले होते. परिणामी बहुतेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने मुले प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. मुले बेपत्ता झाल्यास पालकांकडून शोध घेतला जातो. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली जाते. अशा प्रकरणात थेट अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात येतो.

घर सोडून गेलेली मुले-मुली काही दिवसांत घरच्यांना, मित्रांना, जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधतात. त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी बोलावले जाते, असेही तपासात दिसून आले आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार शहरात नुकताच घडला आहे. त्यासोबतच काही किरकोळ कारणांमुळे मुले घर सोडून जातात, असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बेपत्ता अल्पवयीन मुले

जानेवारी - ३३

फेब्रुवारी - ३१

मार्च - ४६

एप्रिल - ५३

मे - ४३

जून - ३६

एकूण २४२

पालकांनी घ्यावयाची काळजी-

  • मुलांचे मोबाइल वेळोवेळी तपासा
  • मुलांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवा.
  • मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्या.

चित्रपट, मालिकांमधील अनुकरण धोकादायक

चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेकवेळा गुन्हेगारीचे दृश्य दाखवले जाते. याचा परिणाम मुलांच्या मनावर होते. दाखवलेल्या दृश्याप्रमाणे मुले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु चुकीच्या गोष्टीचे अनुकरण करणे मुलांच्या आयुष्यासाठी धोकादायक असते. याची कल्पना मुलांना नसते. त्यामुळे मुले लहान वयात घर सोडून जातात. किंवा गुन्हेगारीचे कृत्य करतात, असे काही घटनांमध्ये समोर आले आहे.

मुलांना एकटे सोडू नये. मुले वयात आले की त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. त्यामुळे देखील अनेक वेळा मुले घर सोडून जातात. मुले आणि पालक यांच्यामध्ये संवाद असणे आवश्यक आहे.

- डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKidnappingअपहरणkidsलहान मुलंMissingबेपत्ता होणं