शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पालकांनो सावधान ! सहा महिन्यांत शहरातील तब्बल २४२ मुले बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 11:25 IST

पोलीस तपासामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर...

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सहा महिन्यांत २४२ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाली आहेत. त्यातील काही मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर काहीजण अद्याप बेपत्ताच आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. पोलीस तपासामध्ये मुले बेपत्ता होण्यामागील विविध कारणे समोर येत आहेत.

पालकांची शिस्त, अभ्यासासाठी दबाव, घरात सतत होणारे वाद, बाह्य जगाचे आकर्षण, शिक्षणाची भीती, सोशल मीडिया आणि चित्रपटात रंगवलेले आभासी जग अशी प्रमुख कारणे मुलांच्या घर सोडण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे तपासांमध्ये दिसून आले आहे.

कोरोना काळात शिक्षण ऑनलाइन झाले होते. परिणामी बहुतेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत संपर्कात असल्याने मुले प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकल्याचे वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. मुले बेपत्ता झाल्यास पालकांकडून शोध घेतला जातो. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली जाते. अशा प्रकरणात थेट अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात येतो.

घर सोडून गेलेली मुले-मुली काही दिवसांत घरच्यांना, मित्रांना, जवळच्या व्यक्तींशी संपर्क साधतात. त्यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी बोलावले जाते, असेही तपासात दिसून आले आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा प्रकार शहरात नुकताच घडला आहे. त्यासोबतच काही किरकोळ कारणांमुळे मुले घर सोडून जातात, असेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बेपत्ता अल्पवयीन मुले

जानेवारी - ३३

फेब्रुवारी - ३१

मार्च - ४६

एप्रिल - ५३

मे - ४३

जून - ३६

एकूण २४२

पालकांनी घ्यावयाची काळजी-

  • मुलांचे मोबाइल वेळोवेळी तपासा
  • मुलांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवा.
  • मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे द्या.

चित्रपट, मालिकांमधील अनुकरण धोकादायक

चित्रपट आणि मालिकांमध्ये अनेकवेळा गुन्हेगारीचे दृश्य दाखवले जाते. याचा परिणाम मुलांच्या मनावर होते. दाखवलेल्या दृश्याप्रमाणे मुले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु चुकीच्या गोष्टीचे अनुकरण करणे मुलांच्या आयुष्यासाठी धोकादायक असते. याची कल्पना मुलांना नसते. त्यामुळे मुले लहान वयात घर सोडून जातात. किंवा गुन्हेगारीचे कृत्य करतात, असे काही घटनांमध्ये समोर आले आहे.

मुलांना एकटे सोडू नये. मुले वयात आले की त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. त्यामुळे देखील अनेक वेळा मुले घर सोडून जातात. मुले आणि पालक यांच्यामध्ये संवाद असणे आवश्यक आहे.

- डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKidnappingअपहरणkidsलहान मुलंMissingबेपत्ता होणं