शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Pahalgam Terror Attack :'..ते म्हणाले खाली उतरा, त्यानंतर एकच गलका झाला अन् थरकाप उडाला' चेतन पवार यांनी सांगितली ‘आपबीती’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:14 IST

- पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक अडकले.

पिंपरी : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेनजीक असलेल्या गोंडोला या उंच ठिकाणी असताना अचानक सैन्याने गोंडोला येथून खाली उतरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले. तेवढ्यात कळाले की, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. हल्ला झालेल्या बैसरन व्हॅलीत आदल्याच दिवशी आम्ही सहकुटुंब गेलो होतो. त्यामुळे क्षणातच अक्षरश: सर्वांगाचा थरकाप उडाला, असे म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पिंपरी-चिंचवड शहर युवा अधिकारी चेतन पवार यांनी ‘आपबीती’ सांगितली.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील काही नागरिक अडकले. शिवसेनेचे चेतन पवार पत्नी आणि दोन मुलांसमवेत जम्मू-काश्मीर फिरण्यासाठी गेले आहेत. त्यांचा १२ जणांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये पिंपरी-चिंचवडमधून पवार यांचेच कुटुंब आहे. पवार यांनी काश्मीरमध्ये अनेक ठिकाणे पाहिली.

चेतन पवार म्हणाले, सोमवारी आम्ही बैसरन व्हॅलीत गेलो. मात्र, त्यापूर्वी तेथे जोरदार पाऊस झाल्याने अनेक पर्यटकांनी व्हॅलीच्या उंच ठिकाणी जाण्याचे टाळले. त्यामुळे तेथे तुरळक गर्दी होती. मात्र, आम्ही पावणेदोन तास घाेडेस्वारी करत बैसरनच्या उंच ठिकाणी पोहोचलो. तेथील निसर्गाचा आणि वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला. त्यानंतर आम्ही मंगळवारी गुलमर्ग येथील गोंडोला येथे पोहोचलो. आम्ही गोंडोलाच्या उंच ठिकाणी फिरण्याचा आनंद घेत होतो. त्यावेळी सैन्याने सूचना केली. सर्वांनी त्वरित खाली सुरक्षित ठिकाणी जा, असे सांगून पर्यटकांना खाली उतरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही सर्वजण गोंधळलो.

नेमके काय झाले, हे समजत नव्हते. मात्र, काळी वेळातच माहिती मिळाली की, आम्ही ज्या बैसरन व्हॅलीत एक दिवस आधी आनंद घेतला त्याच ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. काही पर्यटकांचा त्यात मृत्यू तर काहीजण जखमी झाल्याचे समजले. त्यामुळे आम्ही नि:शब्द झालो. कालवाकालव होऊन मनात काहूर माजले.

गोंडोला येथून सैन्याने आम्हाला खाली सुरक्षित ठिकाणी नेले. स्थानिकांनीही मोठा धीर देत विमानतळावर जाण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले. या हल्ल्याचा स्थानिकांनी निषेध केला. स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. तसेच सुरक्षा यंत्रणांनीही बंदोबस्त वाढवला. त्यामुळे श्रीनगरमध्ये संचारबंदी दिसून येत होती. यावरून परिस्थिती अतिशय गंभीर असून सर्व चित्र भयावह असल्याचे दिसून आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला