शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

‘माळेगांव’वर ४२५ कोटींच्या कर्जाचा विरोधकांचा आरोप धादांत खोटा;अजित पवारांनी लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:11 IST

- निवडणुकीसाठी पार पडल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, पत्रकार परिषदेत गुरुशिष्यांवर केली टीका  

बारामती : विरोधक माळेगांव कारखान्यावर सत्ताधाऱ्यांमुळे ४२५ कोटींचे कर्ज असल्याचे धादांत खोटे बोलतात. ३१ मे अखेर आपल्याकडे २६९ काेटींची ७ लाख १९ हजार ४११ क्विंटल साखर शिल्लक आहे. बँकेची २२९ कोटी कर्ज फेड करून उपलब्ध होणारी रक्कम ४० कोटी रुपये आहे. यामध्ये इथेनाॅल पैसे वेगळे होतात, अशी परिस्थिती असताना विरोधक धादांत खोटे बोलतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी गुरुशिष्यांवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, माळेगांव कारखान्याच्या साखरेवर २२९ कोटींचे कर्ज आहे, तर २६९ काेटींची साखर शिल्लक आहे. त्यामुळे साखर विक्रीतून कर्ज वजा जाता ४० कोटी रुपये शिल्लक उरणार आहेत. कारखान्याने एफआरपी पेक्षा अधिक म्हणजे ३३३२ रुपये सर्वाधिक दर दिला.

अजूनपर्यंत महाराष्ट्रात कोणी दिलेला नाही. मात्र, कारण नसताना विरोधक ‘बाऊ’ करून सभासदांची दिशाभूल करतात. विरोधकांच्या काळात ऊस गाळप सुरू असताना उसाचा साखर उतारा १०.६१ होता, कारखान्यात ज्यूसमधून गळती होती. कारखाना आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही तिथे ‘व्हीएसआय’ची टीम पाठवून अभ्यास करून होणारी रसाची गळती थांबविली. त्यानंतर आमच्या काळात साखर उतारा ११.४७ झाला. चांगल्या पद्धतीने आमच्या लोकांनी कारखाना चालविल्याचे पवार म्हणाले.

विरोधकांनी ३४०० रुपये भाव दाखविला. मात्र, प्रत्यक्षात ३२०० रुपये आणि काहीतरी वर भाव दिला. तो उर्वरित भाव आमच्या काळात देण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी ३४०० रुपये दर दिलाच नाही. माळेगावच्या इतिहासात २०२१ मध्ये उच्चांकी गाळप केल्याचे पवार म्हणाले. 

आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास बचत

विरोधकांनी पतसंस्थेतून पैसे काढल्याचा केलेला आरोप खोटा आहे. पतसंस्थेतून १ रुपयादेखील काढलेला नाही. आपल्या फार पूर्वीपासून कारखान्यात आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेवी ठेवतात. बँकेचा व्याजदर १०.३० ते ११ टक्के आहे. यामध्ये तीन टक्के बचत होत असेल आणि काहींनी आठ टक्के व्याजाने ऐच्छिक ठेव ठेवल्यास यामध्ये काय तोटा आहे. ११ टक्क्यांनी बँकेचे पैसे घेण्यापेक्षा आठ टक्क्यांनी ऐच्छिक ठेव पतसंस्थेने ठेवल्यास काहीच बिघडले नाही, यामध्ये कारखान्याची बचतच होत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

...तर सभासद ठरवतील

माळेगांव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालकांवर विश्वास नसल्याने अजित पवार यांनी स्वत: अर्ज भरल्याचे विराधेक सांगतात. मी ‘ब‘वर्ग प्रतिनिधी आहे, मी काय करावं हा माझा अधिकार आहे. राज्यात अनेक नेते, आमदार, मंत्री, कारखान्याचे चेअरमन होते. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायचं काय कारणं? सभासद ठरवतील कोणाला निवडून द्यायचे ते असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी लगावला.

कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा प्रयत्न

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती धर्म पाळला. आता गरज संपल्यावर अजित पवार महायुती धर्म विसरले आहेत. कारखान्याच्या भल्यासाठी एकत्र लढण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी फेटाळला. लोकसभा, विधानसभेत विरोधक चालतात. मग माळेगावला चालत नाहीत का ?, असे विरोधक म्हणतात. मात्र, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव मला नव्हता. उलट माझ्याच बद्दल माझ्या विचाराचे लोक तिथं जायचे, तर तिथं सांगितलं जायचं, बघा हे आम्हाला भेटायला येतात, यामध्ये सर्वांना माहिती आहे, मी सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

राज्यात ९२ साखर कारखान्यांची ८६४ कोटी एफआरपी थकीत आहे. त्यापैकी २० कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करून साखर ताब्यात घेण्यात आली आहे. त्यातून ती रक्कम देण्यात येणार आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती