शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 15:23 IST

कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाऊल

ठळक मुद्देबाजारात आलेले ओले कांदे घेण्यापेक्षा साठवण केलेला व चांगला वाळलेला कांदा खरेदीस प्राधान्य

किवळे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे कांदा पिकाला ग्राहक मिळत नाही. परिणामी कांदयाचा बाजारभाव खूपच कमी झाला असल्याने किन्हई व परिसरातील काही शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा साठवण करणे अधिक जोखमीचे असले तरी पिकाचा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी साठवण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.        सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात कांदा गरजेची बाब झाला आहे. रोजच्या जेवणात कांदयाचा मुबलक वापर करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर सर्व पदार्थात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. कांद्याचे औषधी गुणधर्म हेही कांदा वापरातील महत्वाचे कारण आहे. कांद्याचे बाजारभाव कमी जास्त होत असल्याने ग्राहक कांदे खरेदी करताना काळजी घेत असल्याचे दिसून येते. तसेच बाजारात आलेले ओले कांदे घेण्यापेक्षा साठवण केलेला व चांगला वाळलेला कांदा खरेदीस प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.         दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे भाजीपाला बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला विक्रीवर सर्वत्र विविध बंधने घालण्यात येत आहेत. बाजारात कांद्याला ग्राहक मिळत नाही . त्यामुळे कांद्याचे बाजार आणखी कमी होत चालले आहेत. बाजारभावाचा फटका शेतक?यांना बसत असल्याने काही शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. तापमान बदलामुळे पोषक वातावरण न मिळाळ्यास कांद्याचे नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळ उभारून कांदा साठवण करण्यास सुरुवात केली आहे. कांदा साठवण केल्याने कांद्याला बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रीसाठी आणून काही प्रमाणात फायदा मिळविणे शक्य असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.     कांदा साठवण करणे हे अत्यंत जोखमीचे आहे. साठवण करताना शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अन्यथा कांदा खराब झाल्यास फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या बाजारात उठाव नसल्याने भावात घसरण झालेली आहे. त्यामुळे तोटा घेऊन विकण्यापेक्षा साठवण केल्यास पुढे फायदा होऊ शकतो . बाळासाहेब दिवसे , कांदा उत्पादक शेतकरी व कृषी मित्र , किन्हई

टॅग्स :kiwaleकिवळेonionकांदाFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस