शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

दुधाच्या भावाचे झाले पाणी..पाणी..! बाटलीबंद पाण्यापेक्षा गायीच्या दुधाला कमी दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 14:59 IST

कृषी व्यवस्थेचा कान असलेला दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरत आहे.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडची पंतप्रधानांकडे अनुदान देण्याची मागणी बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाला कमी भाव

पिंपरी : भारत कृषी प्रधान देश असूनही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे. गायीच्या दुधाचे भाव कोसळले असून पाण्याला दुधापेक्षा जास्त भाव मिळत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारने मिळून दुधाला प्रतिलिटर वीस अनुदान देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

भारत हा कृषी प्रधान देश असल्याचे जगाला अभिमानाने सांगितले जाते. जय किसान असा नाराही दिला जातो. कृषी व्यवस्थेचा कान असलेला दूध उत्पादक शेतकरी शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बळी ठरत आहे. कारण बाटलीबंद पाण्यापेक्षा दुधाला कमी भाव मिळत आहे. घरच्या गाईच्या एक लिटर दुधाला २१ सप्टेंबर रोजी १९ रुपये भाव मिळाला. तर, थेरगाव येथून घेतलेल्या पाण्याच्या बाटलीला २० रुपये मोजावे लागले. 

राज्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करण्यासाठी गायी-म्हशी मोठ्या प्रमाणावर पाळत असतात. शेतकऱ्याला एका लिटर दुधासाठी सुमारे २५ रुपये खर्च येत आहे. जर्शी गायीला लागणारे पशुखाद्य, औषधांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च जास्त होत आहे.         महाराष्ट्रात जो वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) जमा होतो त्यामधील अर्धा वाटा केंद्र सरकारला व अर्धा वाटा राज्य सरकारला मिळत असतो. दूध विक्रीतून शेतकऱ्यांना सध्या जे नुकसान होत आहे, त्याच्या भरपाई पोटी प्रतिलिटर २० रुपये अनुदान देण्यात यावे. त्यातील १० रुपये केंद्र सरकारने आणि १० राज्य सरकारने द्यावे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अनुदानाची ही रक्कम दूध संघाला न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी काळे यांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :Puneपुणेmilkदूधsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी